शरद पवारांनी सभा घेतल्या तर मला बोलावे लागेल;
मुंबई : एक वय असतं. त्या वयात थांबावं लागतं. मग तो शेतकरी असो, शासकीय अधिकारी असो वा उद्योपती किंवा राजकारणी… पण वरिष्ठ नेते थांबालयाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत? पण हे नेमकं कशासाठी? मी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल, समजावून सांग… पण नाही, त्यांना थांबायचंच नाही. तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? चुकलं तर चुकलं म्हणून सांगा, पण तसं ते करत नाही, असा हल्लाबोल करताना मागील महिन्यातही त्यांनी राजीनामा दिला आणि तो परतही घेतला. मग राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची आज पहिलीच जाहीर सभा होतीये. या सभेत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांनी भाषणं केल्यानंतर अजित पवार यांनीही शरद पवारांवर जोरदार टीका करणारे भाषण केलं. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची त्यांनी एकप्रकारे चिरफाडच केली.
अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या मुशीत मी घडलो, त्यांच्या छत्रछायेखाली माझी जडण घडण झाली. ते आपले श्रद्धास्थान आहे. राज्यपातळीवर आणि देशपातळीवर राजकारण चाललंय ते पाहता काही निर्णय गरजेचे आहेत. एखादा पक्ष कशासाठी काम करतो तर लोकांच्या विकासासाठी….
आपल्या वरिष्ठ नेत्यांनी १९६२ ला राजकारणाची सुरुवात केली, ६७ साली आमदार झाले, पुढे मंत्री झाले, १९७८ ला वसंतदादांचं सरकार पाडून साहेब मुख्यमंत्री झाले, १९८० ला पुलोदचा प्रयोग झाला. जेव्हाचा जनसंघ आताचा भाजप साहेबांच्यासोबत होता. १९८० ला निवडणुका झाल्या, इंदिराजींची लाट झाली. इंदिराजी पंतप्रधान झाल्या. इतिहास बघितला तर या देशाला कुणी ना कुणी करिश्मा असलेलं नेतृत्व लागतं. १९७७ ला देशपातळीवर असणारा जनसंघ कुठेय? तर तो शोधावा लागतोय. कारण करिश्मा असणारं नेतृत्व नव्हतं. १९८६ साली समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलिन झाली. पवारसाहेबांना देशाने गेली ५५ वर्ष साथ दिली, असं सांगतानाच अजित पवार यांनी विलिनिकरणाचा इतिहास मांडला.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मी सुप्रीया सुळे यांना म्हटले होतो की शरद पवार यांचे वय झाले आहे. त्यांनी थांबायला हवे आणि आपल्याला मार्गदर्शन करायला हवे. पण सुप्रीया सुळे यांनी ते हट्टी आहेत ते ऐकणार नाही असे तिने स्पष्ट सांगितले. सुप्रीया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासही मी तयार होतो. मात्र, हे ठरवूननंतर शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली. आम्ही शरद पवार यांना विठ्ठल मानतो त्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्याची भूमिका स्वीकारायला हवी असे मत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मला अनेकदा पुढे करत राजकीय टीका करण्यात आली. मला मिळणार असलेली संधी दुसऱ्यांना देण्यात आली. मात्र, मी कधीच काही म्हणालो नाही, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. केवळ मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक आहे का असा सवालही अजितदादांनी उपस्थित केला.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, ठाण्यात तर अशा पठ्याला नेतृत्व देण्यात आले आहे, ज्याने ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते बाहेर काढले. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ते पक्षात मनमानी करतात म्हणून पक्षाला रामराम ठोकला. त्यांना संध देऊ नका असे मला अनेकदा लोकांनी सांगितले पण त्यांच्या हातात धुरा देण्यात आली. नेता होताना आपल्यासह ३ ते ४ आमदार निवडून आणावे लागतात. बेरजेचे राजकारण करता आले पाहिजे. त्सांना कधी ते जमलेच नाही अशा व्यक्तीच्या हातात पक्षाची धुरा दिली आहे असा टोलाही लगावला आहे.