पुणे- देशभर महागाई चा आगडोंब उसळला असताना , रोजगार आणि जीवन जगण्याची लढाई सामान्य माणूस लढत असताना या सामान्यांचे प्रश्न सोडविण्या ऐवजी जाती पातीचे राजकारण करून त्यांना आपसात लढवून भाजपा महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण करू पाहत आहे . या सर्व कठीण परिस्थितीवर मात करून महाराष्ट्राला पुढे नेऊ पाहणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नात अडथळे निर्माण करू पाहत आहे असा आरोप आज पुणे शहर शिवसेनेचे अध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे . अमरावतीच्या राणा दांपत्या वर यावेळी त्यांनी जोरदार टीका केली हिंदू धर्मात भक्तिभावाने आणि श्रद्धेने म्हटल्या जाणाऱ्या हनुमान चालीसाचा राजकीय बाजार मांडला जातोय काय ? या प्रश्नावर बोलताना नेमके पहा मोरे काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …..