कनक महात्मा 100 टक्के तर मानसी देशपांडे ९८.४० टक्के.
पुणे-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२० मध्ये मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चाटें क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबतच चाटे स्कूल कात्रज, धनकवडी, गाऊडदरा मधील विद्यार्थ्यांनीही घवघवीत असे यश संपादन करत चाटे समुहाची उज्वल यशाची परपंरा कायम राखली.यामध्ये चाटे समुहाच्या श्रुती नायर ९८.२०, ईशा देशमाने ९७.८०, नेहा सुपे ९७.८०, ईशा खोब्रागडे ९७.६०, मानसी दौंडकर ९७.६० व गायत्री जाधव ९७.४० अशा अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले.यावेळी प्रा. फुलचंद चाटे यांनी सर्व गुणवतांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चाटे समूहाद्वारे दहावी बोर्ड परीक्षा मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांकरीता झूम मीटिंग द्वारे गुणवंतांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच विद्यार्थ्यांना संबोधून प्रा फुलचंद चाटे सर म्हणाले की या विद्यार्थ्यांना १० वी मध्ये शिकत असतानाच दहावीची तयारी ही पुढील शिक्षणाचा पाया आहे आणि जर दहावी मध्येच चांगले गुण मिळाले तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवून पुढील शिक्षणाची वाटचाल यशस्वीपणे करता येते म्हणूनच विद्यार्थ्यांना आजची स्पर्धा व उद्याच्या संधी लक्षात घेऊन चाटे समूहातर्फे अकरावी आणि बारावी या दोन वर्षाचे महत्व आम्ही पटवून देत आलो आणि त्याकरिता दहावी बोर्ड परीक्षा किती महत्त्वाची आहे याचेही महत्त्व विद्यार्थ्यांना सांगत आलो. आणि यामुळेच की काय आज या झूम मीटिंगमध्ये जे विद्यार्थी आपले कौतुक ऐकण्यास आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालाच्या अगोदरच आपल्या पुढील प्रवेश परीक्षांची तयारी मे मध्येच सुरू केलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थी व पालकांनी दहावीच्या निकालामध्ये फारसे अडकून न राहता पुढच्या वाटचालीस सुरुवात करावी असा सल्ला यावेळी चाटे सरांनी विद्यार्थी व पालकांना दिला.
ईशा देशमाने या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करताना आपले पुढील शिक्षण हे आयआयटी मधून घेण्याचे ठरवल्याचे सांगितले व या करिता मी अगोदरच चाटे कॉलेजमध्ये याची तयारी सुरू केल्याची विद्यार्थ्यांना कल्पना दिली व आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले पालक व चाटे शिक्षण समूहातील सर्व गुरुजन वर्ग यांना जाते असेही यावेळी तिने नमूद केले
चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावी सोबतच बारावी बोर्ड परीक्षेचे मध्येही फार नेत्रदीपक असे यश संपादन केले आहे आणि हे केवळ चाटे शिक्षण समूहाच्या कार्यप्रणाली मुळेच शक्य करता आले आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत मागील ३२ वर्षापासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अतिशय सक्षम पणे व यशस्वीरित्या चालू आहे यामुळेच आज विद्यार्थी व पालकांचा चाटे शिक्षण समूहावर पूर्ण विश्वास आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बापू काटकर यांनी केले यावेळी मीटिंगमध्ये प्रा विजय बोबडे, प्रा रत्नाकर सोनवणे आदी मान्यवरही उपस्थित होते.