पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीलगत असणाऱ्या नऱ्हे गावच्या नागरिकांना पाणी, सार्वजनिक आरोग्य, रस्ते इ सुविधा मिळत नाहीत. अनेक वर्ष हे नागरीक खाजगी टँकर द्वारे पाण्याची गरज भागवत आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने स्थानिक प्रशासनावर ताण पडून ते पूर्णतः अपयशी ठरले आहे. नऱ्हे येथील सर्वसामान्य नागरीकांना पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.या सर्व समस्या निराकरणासाठी नऱ्हे गावाचा समावेश पुणे महापालिकेच्या हद्दीत होणे आवश्यक आहे म्हणून नऱ्हे गावातील नागरिकांनी एकत्र येऊन न-हेगावातील नागरि समस्या आणि न-हेगाव महानगरपालिकेत समाविष्ट करन्यासाठीचे मा मुख्यमंत्री महोदयासाठी चे निवेदन मा जिल्हाधिकारी श्री नवलकिशोर राम यांचेकडे नऱ्हेगाव रहिवासी संघाने नऱ्हेतील सोसायटीनच्या निवेदनाचा संच देण्यात आला. पुणे मनपा हद्दी लगतची गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे शपथपत्र उच्च न्यायालयात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्याची पूर्तता लवकरत लवकर करान्यायाची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. माननीय जिल्हाधिकारी श्री नवलकिशोर राम यांनी ताबडतोब प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवन्याची निर्देश प्रशासनास दिले. यावेळी डॉ विक्रम गायकवाड, श्री राजेश बोबडे, श्री कैलास धायगावे, श्री प्रशांत साळुंखे, श्री चंद्रकांत घाणेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मागणीसाठी नागरीक आमदार व खासदार यांना भेटणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नऱ्हेगाव रहिवासी संघाने दिला आहे .