सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त समता परिषद तर्फे शुभम भोसले चा सत्कार सोहळा संपन्न
वावरहिरे-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे सावतानगर येथील बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे हॉल मध्ये महाशिवरात्रि चे दरमयान वावरहिरे येथील शंभु डोहामधे मयुर गुरव 28 वयाचा तरुण पाणलिंग मंदिरा साठी पुजेला कळशी ने 11 घागरी पाणी घालण्याचे काम परंपरेने करीत अस्तना शभू डोहमध्ये 5 वी घागर अंघोळ करून घेऊन जाताना 25/30 पुट खोल पाण्यात बुडाला त्याला पोहता येत नव्हते.त्यास बुडताना गावामध्ये महाशिवरात्री साठी पाहुणे म्हणून आलेली सौ.सविता धोत्रे यांनी पाहिले तिने आरडा ओरड केल्याने शुभम भोसले व राजू मुळे आले, त्यावेळी डोहातील पानी शान्त झालेले पाहून जमा झालेली गर्दी पोलीस पंचनामा भीतीने निघून गेली पण शुभम भोंसले मुलास, मुलगा बुडल्याचे सविताबाईने व राजू मुळे ने सांगितले मग जीवाची परवा न करता कपड्या निशी काहीच विचार न करता लगेच उडि मारली पण त्याला तो मयुर सपड़ला नाही ,पुन्हा बुडी मारली मग मयुर दिसला तो खोल पाण्यात निपचित पडलेला होता ,काहीच हालचाल नव्हती शुभमने पायला पकडून कमी पाण्याचे बाजूने बाहेर काढले , मयूर ला बाहेर आणले वर राजू मुळे यांनी पोटातील पाणी काढून आणि काही निरगोपचार करून त्याला शुद्धिवर आणले हा प्रसंग 6-7 मिनिटचा खतरनाक जीवघेणा होता अजून थोडे लेट झाले असते तर काय घडले असते देव जाणे.डॉक्टरांनी फोनवरच मयूर शुद्धीवर व चांगला बोलतोय म्हणून दवाखान्यात आणायची गरज नाही म्हंटले.तरी देखील त्याच दिवशी शुभम रात्री 8 वाजता मयूर नीट आहे का सर्दी ताप आला तरी पहाणेस गेला हे पाहून मयूर च्या कुटूंबाने पाया पडून आभार मानले आणि शुभमलाच 200 रू. देऊन 12 वीची परीक्षा चालू असल्याने डॉक्टराकडे जाणेस विनंती केली. शुभम,राजू, व सौ.सविता यांचे प्रयत्नाने मयूर चा जीव वाचविला म्हणून गुरव कुटूंबाने याची जाणीव ठेऊन महाशिवरात्री चे समारीप यात्रेत या तिघांना संपूर्ण पोशाख आणि रोख 500 रुपये प्रत्येकी सरपंच वाघ यांचे व यात्रा कमिटी चे अध्यक्ष अवघडे आणि रघुनाथ ढोक यांचे हस्ते सन्मान केला.या घटनेची योग्य दखल घेऊन सामाजिक कर्तव्ये म्हणून ज्या प्रमाणे सावित्रीबाई ने प्लेग च्या काळात सामाजिक कार्य करताना 10 मार्च 1897 ला मुलास वाचविले तसेच जीवाची बाजी लावून शुभम प्रकाश भोसले ने व राजु मुळे यांनी मयूर चा जीव वाचविला म्हणून गावचे सरपंच चंद्रकांत वाघ यांचे शुभहस्ते शाल गुच्छ आणि फुले,शाहू, आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व पुस्तकसंच भेट दिले
या वेळी वाघ सरपंच म्हणाले की एक जीव वाचवून शुभमने धाडस दाखवून अलौकिक असे कार्य करून मोठे काम केले त्यास शौर्य पुरस्कार मिळणे कामी ग्रामपंचायत कडून सर्व सहकार्य आम्ही करू असे म्हंटले तसेच समता परिषद व फुले संस्थेने याची दखल घेऊन सत्कार केला त्याबद्दल ही आभार मानले. तर रघुनाथ ढोक यांनी या सत्कार चे आयोजन व शुभमला पुरस्कार मिळणे कामी पूर्ण सहकार्य, कागदपत्रे व इतर मदत करणार असल्याचे सांगून माण तालुक्यात असे हिरे निदर्शनात आले पाहिजे तरच इतर तरुण पिढीला चांगले गुण आत्मसात करता येईल असे सांगून तरुणानी अभ्यास तर चांगला केलाच पाहिजे पण सोबत पोहणे हीं कला सर्वांमध्ये अवगत असलीच पाहिजे असे देखील म्हंटले.यावेळी मारुती घनवटगुरूजी, जेष्ठ समाजसेवक श्रीरंग ढोक,श्रीमती बायडाबाई ढोक,इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून व सम्पूर्ण घटनेचा प्रसंग तुळशीराम यादव यांनी सांगितल्याने लोक गहिवरून गेले या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,आकाश ढोक, अमित ढोक,तेजस ढोपे व श्री संत सावता माळी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते ने केली.