पंढरपूरात आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला- देवेंद्र फडणवीस
मुंबई: . .”राज्यातील पोटनिवडणूक त्यांना जिंकता आली नाही. पण योग्य वेळी त्यांचा योग्य तो कार्यक्रम करू, पण आता कोरोनाशी लढायचं आहे”, असा सूचक इशारा पंढरपूरमधील विजयानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.
फडणवीस म्हणाले,’. “पंढरपूरमध्ये मिळालेल्या विजयासाठी जनतेचे आभार. त्यांनी आम्हाला निवडले. सत्तेचा तेथे खूप गैरवापर झाला. पैशाचा गैरवापर करण्यात आला. आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. भाजप एकत्रित काम करत होती. जनतेपर्यंत पोहोचून आम्ही जनतेची मत मिळवू शकलो. या सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. बाराबलुतेदारांमध्ये नाराजी होती. गरजू कुटुंबांची वीज तोडली गेली. त्यामुळे लोक नाराज होते. आम्हाला निवडलं. आम्हाला पंढरपुरात पांडुरंगाचा आशीर्वाद आम्हाला मिळाला,आपण जर विचार केला तर हे सरकार आल्यापासूनची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक ही आहे आणि त्या निवडणुकीत ज्या प्रकारे सत्ताधारी पक्षाच्यावतीने तिन्ही पक्ष उतरले साम, दाम, दंड असे सर्व प्रकार त्या ठिकाणी वापरले गेले. प्रशासनाचा गैरउपयोग केला. मोठ्याप्रमाणात पैशांचा गैरवापर केला पण हे सगळं केल्यानंतर देखील, त्या ठिकाणी भाजपाला जनतेने निवडून दिलं. मी निमित्त आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचे अभिनंदन करतो आहे.” असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.