राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका करणारे ट्वीट केले आहे , यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि ,” बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
नंदीग्राम मतदारसंघातील निवडणूक निकालावरून संभ्रमावस्था आहे. सुरुवातीला ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर शुभेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी फेरमोजणी करण्याची मागणी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप मतमोजणी सुरू असून, सर्वांनी संयम राखावा, असे आवाहन तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आले आहे. यातच आता शरद पवार यांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकारावर टीका केली आहे.