उपमुख्यमंत्री अजित पवार का संतापले ?
पुणे पोलीस आयुक्त कार्यालया समोर सुरेश पिंगळे यांची पेटवून घेऊन आत्महत्या , मोटार सायकल स्वारासह बाइक पोलिसांच्या टोइंगवाहनाने उचलली… या दोन्ही प्रश्नांवर पहा काय म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार .. इथे ‘तो’भाग..तर खाली अनकट संपूर्ण पत्रकार परिषद
राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून जातिवाद वाढला या राज यांच्या विधानावर प्रतिक्रिया…राज ठाकरे यांच्या बोलण्याला महत्व देण्याचे कारण नाही –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद-अन्य-1) पहिला डोस झाला त्यांना प्राधान्याने दूसरा डोस दिला जाईल.2) गेल्या 4 आठवड्यात पुण्याची रुग्ण संख्या हळू हळू कमी होते आहे.3) दिवाळी पर्यन्त शाळा सुरु करू नये अशी टास्क फोर्स ची भूमिका.. अंतिम निर्णय सीएम घेतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. आजच्या कोरोना आढावा बैठकीनंतर पुण्यात माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.राज ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देताना, “त्यांच्यावर न बोललेलंच बरं,
पुण्यात लसीकरणाचा तुटवडा जाणवत असताना पहिल्या डोसला प्राधान्य दिले जाते. पण आता शहरातील लसीकरण लवकरत – लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येईल. अस अजित पवार यांनी सांगितलं.मी स्वतः सहमत आहे की, बूस्टर डोस दिला पाहिजे, पण आधी १८ वर्ष वयाच्या जास्त लोकांना दोन्ही डोस देणं प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. असही ते म्हणाले आहेतपवार म्हणाले, पुण्यात लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार झाला आहे. गेल्या महिन्यात पुण्यात १६ लाख नागरिकांचे लसीकरण झालंय. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. तसंच लसीकरण जास्ती जास्त करण्याचा प्रयत्न आहे. जागतिक स्तरावर माहिती घेतली तर ५ ते ६ लाख दररोज रुग्ण आढळत आहेत. तिसऱ्या लाटेची धोक्याची सूचना आहे. त्यापार्श्वभूमीवर काळजी घेतोय. चार आठवड्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसतेय. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता काळजी घेतली जात आहे. आवश्यक ती तयारी केली जात आहे.पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यू, मलेरिया असे आजार पसरू लागतात. त्याचप्रमाणं अशुद्ध पाण्याने टायफाईड सारख्या आजारांचा धोका संभवण्याची शक्यता असते. त्यावर बोलतां पवार म्हणाले, डेंग्यू, टॉयफाईड होणार नाही, पसरणार नाही याची काळजी आम्ही सर्वच घेत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांचे पथक लक्ष ठेऊन असणार आहेत.