नवी दिल्ली- – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘’६-अ’’ कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी शिंदे आणि फडणवीस यांनी सुमारे सहा तास चर्चा केली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्रीनंतर अडीच वाजता संपली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणाऱ्या सुनावणीसंदर्भातील कायदेशीर गुंतागुंत या दोन मुद्द्यांवर प्रामुख्याने खलबते झाल्याचे समजते. त्यामुळे खातेवाटप कधी हाच प्रश्न विचारला जात असून मोदींच्या भेटीआधी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या कळीच्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
अकरा जुलै ची कोर्टातील तारीख , कोर्टातील सरकारबाबत शिवसेनेच्या याचिका यावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणे आहे त्यामुळे बरेच काही कोर्टाच्या निर्णयानंतर काय करायचे हेच ठरल्याचे समजते .राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर शिंदे व फडणवीस भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशीही चर्चा केली आहेत. शहा आणि नड्डा यांच्या भेटींमुळे राज्यातील शिंदेंच्या सरकारवर भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. नड्डा यांच्याशी शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युती मजबूत करणे यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते. नड्डा यांच्या व्यतिरिक्त शिंदे व फडणवीस केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेटघेतली असून त्यानंतर दिल्ली दौऱ्यातील शेवटची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असेल.असे सांगण्यात येते .