रेडीरेकनर संदर्भात प्रतिक्रिया
गेल्या दोन वर्षांपासून जागेच्या कागदोपत्री मूल्यात वाढत झाली नसल्याचा सकारात्मक संकेत या निर्णयातून होतो. ग्राहकांनी हे लक्षात घेऊन आता घरांच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता करू नये. घरांचा दर आज मितीला असणारा नीच्चांकी दर असून इथून पुढे याहून हा दर अजून कमी होण्याची शक्यता नाही. कारण गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम खर्च, कर वाढ आणि मागणीतील घट यामुळे प्रचंड तोटा बांधकाम व्यावसयिकांना सोसावा लागला आहे. त्यामुळे द्रष्ट्या ग्राहकांनी आता अजून वाट न पाहता घर खरेदी करावे. वित्तसंस्थामार्फतही मोठ्या प्रमाणात कर्जांची उपलब्धता होत असल्याने याचा लाभ इच्छुक ग्राहक घेतील, अशी आशा आहे.
अतुल गोयल (व्यवस्थापकीय संचालक, गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा. लि.)