पुणे-कोरोनाच्या काळात सर्व शाळा , कॉलेज जवळ-जवळ 2 वर्षे बंद होत्या. आज इयत्ता 8 वी ते 10 वी ची शाळा सुरू झाली. अरण्येश्वर माध्यमिक विद्यालय (पद्मावती) , विद्या विकास शाळा व मुक्तांगण स्कुल मध्ये जाऊन नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी विद्यार्थ्यांचे कॅटबरी देऊन स्वागत केले.
नगरसेविका आश्विनी कदम यांनी संवाद करताना मास्कचे फायदे , वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत , सॅनिटाईजरचा वापर करावा व कोरोना पासून बचाव कसा करावा या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी विनायक जांभोरकर, बाळासाहेब ढुमे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते अमोल ननावरे , तुषार नांदे , सचिन समेळ ,संजय कानडे, विष्णू चव्हाण, सुभाष तिखे, मयूर शिंदे , सचिन जमदाडे,प्रवीण जाधव , अरुण ढावरे , प्रसाद खंडाळे, आदित्य देसाई उपस्थित होते.