राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष-गिरीश बापट
पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष आहे. एकेकाळी राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला हा पक्ष आता स्थानिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणारा हा पक्ष नावात राष्ट्रवाद असून छुपा जातीयवादी आहे.” असा घणाघात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत स्वराज्य स्थापनेसाठी मोलाची कामगिरी बजावलेल्या पुण्यातील सरदार घराण्यांचा वंशजांचा कोथरूड येथे मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात सरदार घराण्यांनी पुणे शहर लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट तसेच बारामती मतदार संघातून कांचन कुल यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शविला.
बापट म्हणाले की, छत्रपतीं शिवाजी महाराजांनी जात, पात, धर्म, वंश अशा कोणत्याच भेदभावाला थारा न देता स्वराज्यातून सुशासनाचा आदर्श मांडला. परंतु, विरोधक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जातीय राजकारण करत आहे. छत्रपतींच्या नावाने जातीचे राजकारण म्हणजे त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करण्यासारखे आहे आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यांना आम्ही आदर्श मानतो. याचा त्यांना मात्र त्रास होतो. शिवाजी महाराजांचे नाव आम्ही घेतल्यावर यांच्या पोटात का दुखते? असा सवाल ही बापट यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, जातीयवाद ही समाजाला लागलेली कीड आहे. जातीय प्रवृत्तीमुळे देशाचे नुकसान होते. देशाला विकासाच्या राजकारणाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांची मात्र ह्यांनी जात काढली. छत्रपतीं शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तसेच आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात मी कधीच भेदभाव केला नाही. म्हणूनच अठरा पगड जातीचे वर्चस्व असणाऱ्या कसबा मतदार संघातून ५ वेळा मी निवडून येऊ शकलो. ज्या सरदारांनी स्वराज्याच्या स्थापनेत योगदान दिले त्यांचे नाव घेताना सुद्धा ऊर अभिमानाने भरून येतो, असेही बापट यावेळी म्हणाले.
मेळाव्यात सुनील मारणे, सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरकार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, वीर सरदार मानाजी पायगुडे, सरदार मानाजी पायगुडे, सरदार कान्होजी कोंडे, सरदार बाबाजी ढमढेरे, सरदार पिलाजीराव सणस, सरदार हैबतराव शिळीमकर, सरदार त्र्यंबकराव नाईक निवांगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार कडू शिक्केकरी, सरदार अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, राजगड सरनोबत सिधोजी थोपटे, सरदार शितोळे सरकार, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, श्रीमंत पवार घराणे,श्रीमंत दामाजीराव गायकवाड सरकार,श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार,गुप्तहेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद अंगरक्षक जीवाजी महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, राजेश्री सरदार हांडे, स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस, सरदार काळे, धैर्यवीर शिवले, वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्या सारंग सरखेल, कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे,श्रीमंत सरदार गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव ) श्रीमंत सरदार लुखाजीराव घारे, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कावजी कोंढाळकर, पायदळ सरनोबत पिलाजी गोळे, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला,श्रीमंत पवार घराणे, श्रीमंत दामाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार,गुप्तहेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद अंगरक्षक जीवाजी महाले,सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे,सरदार मल्हारजी तुकोजी निगडे,राजेश्री सरदार हांडे,श्रीमंत सरदार भोईटे, स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस, सरदार काळे, धैर्यवीर शिवले, वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्यासह माजी खासदार प्रदीप रावत, माजी आमदार रंजना कुल, शरद ढमाले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक सुशील मेंगडे, दिलीप वेडे पाटील, दीपक पोटे, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, जयंत भावे, छाया मारणे, शैलेश जोशी आदी उपस्थित होते.