पुणे- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात सर्वार्थाने आचरणात आणले गेले तर देशात खऱ्या अर्थाने सुराज्याची निर्मिती होईल असे मत सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी येथे व्यक्त केले .न-हे आंबेगाव राज कदम नवदीप सोसायटीचे चेअरमन विष्णू कदम तसेच पोलीस अधिकारी कनसे त, दीपक खेडेकर ,थोरबोले आणि शिवसेना विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले,’भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या पैलूंपैकी एक एक पैलूंचे विश्लेषण केले तरी त्यातून समाजाला भरपूर ज्ञानसंपदा मिळणार आहे.त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे मत देविदास घेवारे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उद्योजक विठ्ठल पांगरे, दशरथ राजगुरू ,मस्तान जाधव, भारत धावरे, बाबासाहेब कदम प्रेरणा बहू उदेशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वंदना कदम, लता राजगुरू, संगीता पाटील ,अमित कदम ,प्रतिक कदम ,यमनूर मळेकर, गौतम शिरसट ,गोवर्धन शामकुंवर ,युवराज पारगे, विशाल ओव्हळ,अण्णासाहेब शेंडे इ.मान्यवर उपस्थित होते सूत्र संचालन दशरथ राजगुरू यांनी केले.


