पुणे-जेष्ठ समाजवादी नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.त्यांना कर्करोग झाला होता. त्यांच्या याच आजारावर मागील काही दिवसांपासून पूना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना. मात्र आज अखेर सायंकाळ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ समाजवादी नेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा अभिजीत वैद्य, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा अभिजीत वैद्य, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, या उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नव्हते. परिणामी, त्यांची प्रकृती आणखी खालावली. वैद्य यांची आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तीन आठवड्यांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विकारामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता. त्यांच्यावर कार्डिअॅक अतिदक्षता विभागात (सीसीयू) उपचार सुरू आहेत. त्यांना कृत्रीम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते.