शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात वेगाने काम होत आहे
खोके मिळायचे बंद झाल्यानेच ओरड
‘बाळासाहेबांची शिवसेना’ चा मेळावा संपन्न
पुणे- इतिहासाची माहिती नसलेल्या लोकांनी काहीतरी बोलून समाजात गैरसमज निर्माण करू नयेत, रोज नवा वाद निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत, असा टोला संबंधित नेत्यांना लगावला. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात मेळावा झाला. शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे ,अजय भोसले, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , मावळचे खासदार श्रीरंग बारणे ,सुधीर कुरूमकर, संजय अगरवाल महिला आघाडीच्या लीना पानसरे. यांच्यासह शिंदे गटातील अनेक नेते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते.
दररोज सकाळी भोंगा वाजतो. खंजीर, खोके, गद्दार हेच शब्द त्यातून बाहेर पडतात. परंतु पूर्वी हे खोके कोणाकडे जायचे, पैसे कोण मोजायचे हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.आता ते खोके बंद झाले म्हणून ओरड सुरू झाली आहे,’ अशा शब्दात बाळासाहबेंची शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी पलटवार केला. या आधी वर्षां बंगल्याचे दरवाजे सर्वांसाठी बंद होते. आता ते सर्वांसाठी खुले झाले आहेत, असेही ते म्हणाले.
पुण्यात मी पहिल्यांदाच येत आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, ”नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, म्हणून उठाव झाला. मंत्री, आमदार, खासदार यांना भेटायचे नाही. तर सामान्य शिवसैनिकांची भेट होणे तर सोडाच. अडीच वर्ष मुख्यमंत्री असून शिवसैनिक काय यातना भोगत होते, हे पाहिला यांचा वेळ देखील नव्हता. म्हणून सत्तेला लाथ मारून पन्नास आमदार आणि १३ खासदार आज बाहेर पडले. सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्री झाला. गेली अडीच वर्ष बंद असलेल्या वर्षाबंगल्याची दारे सर्वासामान्यांसठी खुली झाली.”
दरम्यान, पुण्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करावी, अशी मागणी नाना भानगिरे यांनी आपल्या भाषणातून केली. त्याचा उल्लेख करून डॉ.शिंदे यांनी रिंग रोडसाठी १० हजार ५०० कोटी मंजूर केले असून, अन्य प्रश्नही सोडविण्यात येतील, असे सांगितले.
गोगावले म्हणाले, ”घरात बसून सगळे निर्णय होत नसतात. काही जनतेत येऊन निर्णय घ्यायचे असतात. मुख्यमंत्र्यांनी आता कामातून जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. ते पंधरा-पंधरा तास काम करतात. त्यांना कधी थकलेले पाहिले नाही.” यावेळी आढळराव यांची देखील भाषण झाले. यावेळी शिंदे यांच्या उपस्थित अनेकांना पक्षप्रवेश देण्यात आला.यावेळी खासदार डॉ. शिंदे यांचा सत्कार भानगिरे यांनी केला.
पुण्यात स्वतंत्र बैठक घ्यावी : प्रमोद भानगिरे
महापालिका प्रशासन काहीच काम करत नाही. आगामी पालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना तयार असून पालिकेवर भगवा पडकविल्या शिवाय राहणार नाही. पुणे शहरातील अशाच विविध समस्या सोडविण्यासाठी जास्त लक्ष देण्याची गरज असून पुण्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करावी, अशी मागणी शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी आपल्या भाषणातून केली.