पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, श्री.शाहू मंदिर महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पर्वती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पदवी प्रदान सोहळ्याचे उद्घाटन डॉ.एन.एस.उमराणी प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सरचिटणीस प्रमिला गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉ.एन.एस.उमराणी यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञाना बरोबर लिबरल एज्युकेशनची कास धरत तत्वज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अमर्याद पर्याय उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत विद्यार्थी हा सर्व क्षेत्रात निपूण असला पाहिजे तरच त्याला नोकरीची संधी उपलब्ध राहील. तुम्ही सतत उत्कृष्ट कार्य करून अनुभवातून आजीवन ज्ञानग्रहण केले पाहिजे. व त्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उत्कर्षासाठी करून देशाला शक्तीशाली बनवले पाहिजे. तसेच सर्वांनी नैतिक मुल्ये जपून सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टीम वर्क, संभाषण कौशल्य, निर्णय क्षमता,समन्वय या गोष्टी आत्मसात करण्याशिवाय चांगला पर्याय नाही. ज्ञानसंपन्न सुजलाम सुफलाम भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन अद्यायावत तंत्रज्ञानाला धसाड, संयम व शहाणनाची जोड द्यावी असे प्रतिपादन केले. सदर सोहळ्यास डॉ.एन.एस.उमराणी, संस्थेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, संयुक्त चिटणीस अॅड. भगवानराव साळुंखे, खजिनदार श्री.विजयसिंह जेधे, श्री.धैर्यशील वंडेकर,श्री.गंगाधर घारे,श्री किशोर बाबर, प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे, डॉ. जिनत खान, डॉ. शुभदा घोलप सर्व विभागप्रमुख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.गायत्री कांबळे व प्रा.स्नेहा साळवेकर यांनी केले.