मुंबई- ईडीच्या कारवाया मोदी सरकारच्या आदेशाने होत असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सर्वांना प्रश्न विचारणाऱ्या ईडी पुढे 4 प्रश्न उपस्थित केले आहेत.आणि त्यांची उत्तरे मागितली आहेत . आपल्या ट्विटर हँडलवरून सचिन सावंतांनी ईडीला सवाल केले आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने अनिल देशमुखांवर आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि तपासात बाहेर आलेल्या गोष्टी यावरून हे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले आहेत ईडीची ही कारवाई म्हणजे राज्यातील महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही सावंतांनी केला. सावंतींनी ट्विट केले की, ‘या सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशाने आणि महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत या आमच्या म्हणण्याला यातून बळ मिळत आहे.’
अंमलबजावणी संचालनालयाने उत्तरे द्यावीत असे म्हणत सचिन सावंतांचे 4 सवाल
- अजूनही 300 कोटींच्या मीडियातील वावड्यांची पुष्टी करता का? कारण आता आपल्या म्हणण्याप्रमाणे ही जमीन 2005 मध्ये खरेदी केली गेली आणि 2.67 कोटी किंमतीची आहे?
- फ्लॅटची किंमत 2004 मध्ये दिली गेली तर तो या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो?
- तुम्ही जाहीर केले की डान्स बारच्या मालकांनी वाझे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना 4.70 कोटी दिले. ते बार मालक अद्याप गजाआड का नाहीत?
- तथाकथित 100 कोटींच्या मागणीची माहिती असूनही कोणतीही कारवाई न करणाऱ्या परमबीर सिंह यांची चौकशी का केली जात नाही?