भाजपाने बाजी मारली, राष्ट्रवादी,सेनेने गड राखले .
काँग्रेसच्या एकाचा विजय तर एकाचा पराभव
मुंबई -संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विधानपरिषदेच्या 10 व्या जागांसाठी 11 उमेदवार उभे होते.काँग्रेस चे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.संख्याबळ नसताना देखील भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी त्यांचा पराभव केला. हाती भाजपने विजय मिळवला.
काँग्रेसच्या भाई जगताप यांचा विजय झाला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजें निंबाळकर, एकनाथ खडसे शिवसेनेचे आमशा पाडवी आणि सचिन अहीर, भाजपचे श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, आणि प्रवीण दरेकर यांचा विजय झाला. ही सर्व मते पहिल्या पसंतीची होते.
काँग्रेसचे भाई जगताप ,चंद्रकांत हंडोरेआणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात खरी काटे की टक्कर होती. अखेर यात प्रसाद लाड यांनी बाजी मारत हंडोरे यांचा पराभव केला. आणि काँग्रेसचे भाई जगताप एकटे विजयी झाले, महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निकालामुळे महाविकास आघाडीत एकी नाही हे दिसून आले.काँग्रेसला एकाकी पाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले.काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील मते नेमकी किती ,कुणाची फुटली यावर आता मंथन होईल पण महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम असती तर भाजपाच्या पाचव्या उमेदवाराला मते गेली नसतीआणी काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आला असता, या विचाराने आता राज्यातील आघाडी सरकारमध्ये काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष लागून राहणार आहे .
भाजपाचे सगळे नेते विजयाचा आनंद साजरा करत आहेत. किंगमेकर फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेते विजयी जल्लोष साजरा करत आहेत
भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल १३३ मत पडले आहेत. राष्ट्रवादीला एकून ५७ मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीला एकून ६ अपक्षांची मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्याही पहिल्या पसंतीची ३ मतं फुटली आहेत. दरम्यान भाजपला अधिकची २७ मतं मिळाली आहेत.
विजयी उमेदवार
भाजप-
1. प्रवीण दरेकर –
2. राम शिंदे –
3. श्रीकांत भारतीय
4. उमा खापरे
5. प्रसाद लाड
शिवसेना –
1. सचिन अहिर
2. आमसा पाडवी
राष्ट्रवादी काँग्रेस-
1. रामराजे निंबाळकर
2. एकनाथ खडसे
काँग्रेस-
1. भाई जगताप
दरम्यान काँग्रेसने आपले आमदार फुटल्याचं मान्य केलं आहे. दरम्यान शेवटच्या क्षणाला काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला यासंदर्भात आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.काँग्रेसने आपले आमदार फुटल्याचं मान्य केलं आहे. काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे तर भाई जगताप विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील आमचे मत फुटल्याचं माध्यमांना बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. या कारणावरून त्यांनी फुटलेल्या आमदारांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.काँग्रेसकडील त्यांचे स्वत:चे तीन मत फुटल्याचं समोर आलं आहे. तर शिवसेनेचे तब्बल १२ मत फुटल्याचं समोर आलं असून थोरातांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अकरा उमेदवारांपैकी काँग्रेसच्या हंडोरेंचा पराभव झाला आहे
राष्ट्रवादीची चाणाक्ष खेळी, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेत सर्व जागा राखल्या
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा चाणाक्ष खेळी केली आहे. राष्ट्रवादीने आपले दोन्ही उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना अगदी पद्धतशीपणे निवडून आणलं. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील सर्वात सुरक्षित आणि चाणाक्ष पक्ष म्हणून समोर आला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले ,
विधान परिषदेच्या निवडणूकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत, आम्ही राज्यसभेच्या निवडणूकीत आम्ही १२३ मते घेतली होती आता १३४ मते घेतली आहेत असे त्यांनी सांगीतले. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीये म्हणून आमदारांनी आम्हाला मते दिली असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली असे फडणवीस यावेळी म्हणाले. या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली असे ते म्हणाले, या सरकारच्या विरोधातील असंतोष समोर आला आहे, यापुढे असाच संघर्ष सुरू राहील आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच तो थांबेल असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.