टाटा पॉवरने महिला स्वयंसहायता गट व शेतकऱ्यांच्या मदतीचे कार्य सध्याच्या काळात देखील सुरु ठेवले आहे. कोविड-१९ मुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये जमशेदपूर व झारखंडमधील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या नाशवंत भाज्या व फळे बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याचे काम टाटा पॉवर करत आहे. टाटा पॉवरने आपली सहयोगी एजन्सी आइडेंट (एआयडीईएनटी) या सामाजिक कल्याण संघटनेच्या मदतीने जवळपास ३०,००० किलो भाज्या व खरबूज जमशेदपूर व धनबाद, रांची या जवळपासच्या जिल्ह्यांमधील स्थानिक बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यात मदत केली आहे. यामुळे खैरभोनी, डोमजुरी, नूतनदीह, खाकरीपारा गावांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोविड-१९ आजाराच्या साथीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दळणवळण सेवांवरील निर्बंधांमुळे शेतात पिकवला जाणारा माल बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. ही परिस्थिती समजून घेऊन टाटा पॉवरने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने उत्पादने मंडई व बाजारपेठांपर्यंत पोहोचवली आहेत. अशा तऱ्हेने टाटा पॉवरने समाजाच्या रोजगाराला मदतीचा आधार दिला, त्याचबरोबरीने स्थानिक बाजारातील मागणी व पुरवठा गरजा पूर्ण करण्यात देखील मदत केली आहे.
या उपक्रमाबाबत टाटा पॉवरचे सीईओ व एमडी श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “सध्या आपण सर्वजण एका अभूतपूर्व संकटाचा मुकाबला करत आहोत. एकजुटीने एकमेकांना मदत करणे ही काळाची गरज बनली आहे. या भागातील शेतकऱ्यांचा रोजगार सुरु राहावा यासाठी त्यांना मदतीचा हात देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला जसे जमेल त्याप्रकारे आम्ही त्यांना मदत करत राहू.”
स्थानिक जनतेला पर्यावरणाला अनुकूल जीवन जगण्यात मदत करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करून सबळ व सक्षम करण्यात तसेच कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी टाटा पॉवरने मदत केली आहे. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन टाटा पॉवर कंपनीने तातडीने मदतीचा हात दिला, त्यामुळे शेतकरी व उत्पादकांचा रोजगार टिकून राहिला आणि समाजाला अत्यावश्यक वस्तू देखील उपलब्ध झाल्या.