गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साजरा करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने महाराष्ट्रीय पद्धतीच्या दागिन्यांची संकल्प ही अनोखी श्रेणी लाँच केली आहे. शुद्ध सोन्याच्या दागिन्यांची ही श्रेणी पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांपासून प्रेरणा घेत बनवण्यात आली आहे.
कोल्हापूरी साजपासून ठुशी नेकलेसपर्यंत आणि बकुळी हारापासून तोडे आणि नथीपर्यंत सर्व दागिने या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले असून या प्रांताचा वारसा या दागिन्यांच्या खास डिझाइन्समधून जपण्यात आला आहे. संकल्प श्रेणी कलाकुसर आणि डिझाइन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कालातीत महाराष्ट्रीय दागिन्यांची आठवण करून देणारी आहे. हे नवे वर्ष आणखी उठावदार करण्यासाठी कल्याण ज्वेलर्समध्ये खरेदी करणाऱ्यांना सोन्याच्या दागिन्यांच्या व्हीएवर (व्हॅल्यू अडिशन्स) 30 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याशिवाय दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हिरे व पोल्की दागिने खरेदी केल्यास 25 टक्के सवलत, तर अनकट व प्रेशियस स्टोन्सच्या दागिन्यांवर 20 टक्के सवलत दिली जाणार आहे.
कल्याण ज्वेलर्सचे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. टीएस कल्याणारामन म्हणाले, ‘गुढीपाडवा नवी सुरुवात आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा दिवस सोनेखरेदीसाठी महत्त्वाच्या मुहूर्तांपैकी एक मानला जातो. सोन्याचे दागिने समृद्धीचे प्रतीक असल्यामुळे नव्या वर्षाच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. या महत्त्वाच्या दिवशी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत आम्ही सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांची संकल्प ही श्रेणी लाँच केली असून ती या हंगामात खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम आहे.’
या पाडव्याच्या निमित्ताने कल्याणने ग्राहकांसाठी दर संरक्षण योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे त्यांना सोन्याच्या किंमती लॉक- इन करून भविष्यातील किंमत वाढ आणि चढ- उतारापासून सुरक्षित राहाता येते. ग्राहकांना बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीनुसार एकूण खरेदी रकमेच्या 10 टक्के रक्कम आगाऊ भरून दागिने आरक्षित करता येतील. त्याशिवाय कल्याणची आकर्षंक एक्सचेंज योजना ग्राहकांची गुढीपाडव्यानिमित्तची खरेदी आणखी फायदेशीर बनवेल.
कल्याण ज्वेलर्सच्या नव्या ब्रँड अभियानात संकल्प श्रेणीचा समावेश केला जाणार असून त्यात कंपनीची प्रादेशिक ब्रँड अम्बेसिडर आणि मराठी अभिनेत्री पूजा सावंतही झळकणार आहे. या श्रेणीची किंमत 35 हजार रुपयांपासून पुढे असून हे दागिने महाराष्ट्रातील कल्याण ज्वेलर्सच्या सर्व दालनांमध्ये उपलब्ध आहे.
कल्याण ज्वेलर्सबद्दल
केरळ राज्यातील थिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या दागिने उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहेत. कंपनी गेल्या शतकभरापासून देशातील वस्त्रोद्योग ट्रेडिंग, वितरण आणि हाउक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. 1993 मध्ये दागिन्यांचे पहिले दालन सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीने दर्जा, पारदर्शकता, किंमती आणि नाविन्य यांमध्ये नवे मापदंड तयार केले आहेत.
कल्याण ज्वेलर्सद्वारे ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करणारे सोने, हिरे आणि प्रेशियस स्टोन्समधील पारंपरिक व अत्याधुनिक दागिने तयार करण्यात येतात. कल्याण ज्वेलर्सची भारत आणि पश्चिम आशियात मिळून 144 दालने कार्यरत आहेत.