राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 च्या ठोक्याला मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर 9 वाजेपर्यंत 6.64% मतदान झाले. बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच 11 मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे पहिल्या 2 टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
माढ्यात सर्वात कमी 4.99टक्के मतदान तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 8.17 % सर्वाधिक मतदान
राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. माढ्यात सर्वात कमी 4.99टक्के मतदान तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 8.17 % सर्वाधिक मतदान झाले.
1. लातूर – 7.91 %
2. सांगली – 5.81 %
3. बारामती – 5.77 %
4. हातकणंगले – 7.55 %
5. कोल्हापूर – 8.04 %
6. माढा – 4.99 %
7. धाराशिव – 5.79 %
8. रायगड – 6.84 %
9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 8.17 %
10. सातारा –7.00 %
11. सोलापूर – 5.92 %