मुंबई – पाकिस्तानमधील जिहादी गटांकडून सिद्धीविनायक मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याची नेमकी शक्यता गुप्तचरांनी वर्तविल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या या आर्थिक राजधानीमधील बंदोबस्त प्रचंड वाढविण्यात आला असून; संपूर्ण शहरामधील सुरक्षा व्यवस्था “हाय अलर्ट‘वर ठेवण्यात आली आहे.
भारताच्या गुप्तचर विभागाने (आयबी) यासंदर्भातील नेमकी माहिती मुंबई व महाराष्ट्र पोलिसांना दिली आहे. असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे , त्यांच्या वृत्तानुसार असे समजते कि , जमात-उद-दवा, लष्करे तैयबा, जैश-उल-मुहम्मद आणि हिझबुल मुजाहिदीन या पाकमधील चार दहशतवादी संघटनांनी दहशतवाद्यांचे चार गट करुन, ते याआधीच भारतामध्ये पाठविले आहेत. हे दहशतवादी गट 28 जानेवारीच्या आधी देशामध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची शक्यता गुप्तचरांनी वर्तविली आहे. या चार गटांपैकी एक महाराष्ट्रामध्ये, एक राजस्थानमध्ये, एक उत्तर प्रदेश; तर अखेरचा गट पथक उडिशामध्ये आल्याचे गुप्तचरांनी म्हटले आहे.मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर मंगळवारी भाविकांची गर्दी होत असते. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असल्यामुळे दहशतवादी सिद्धीविनायक मंदिरात हल्ला घडवून आणू शकतात. ‘जमात-ऊल-दावा’, ‘लष्कर-ए तैयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या चार दहशतवादी संघटना देशात सक्रीय झाल्या असून चौघांपैकी एक महाराष्ट्रात, दुसरी राजस्थानात, तिसरी उत्तर प्रदेशात आणि चौथी उडिशात पाठवण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मुंबईमध्ये सिद्धीविनायक मंदिरास विशेषत्वाने लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी असलेल्या कोणत्याही मंगळवारी हा हल्ला घडविण्यात येण्याचा अंदाज गुप्तचरांनी वर्तविला आहे. मुंबईमध्ये आलेल्या दहशतवादी गटाचे नेतृत्व अब्दुल्ला अल-कुरेशी हा दहशतवादी करत असून त्यामध्ये पंचविशीच्या वयोगटां मधील