पुण्याच्या कॉंग्रेस भवनाचा बदललेला चेहरा कॉंग्रेसचे परंपरागत मतदार देखील स्वीकारणार नाहीत .
अजितदादांच्या नेतृत्वाचाच विजय निश्चित होईल
पुणे- बारामती लोकसभा मतदार संघात ७ तारखेला मतदान आहे , या निवडणुकीत या मतदार संघाकडे देशाचे लक्ष लागून आहे, येथे चुरशीची निवडणूक होईल असे मानले जात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी ,आजवर लोकांनी ताईंना संधी दिलेली आहे आता लोक वहिनींना संधी देतील असे विधान केलेआहे. लोकांना पवारांच्या घरगुती मतभेदाच्या संदर्भात काही रस निश्चित नाही मात्र एकाच घरातील, कुटुंबातील लोकांच्यात मतदार भेदभाव देखील करणार नाहीत. सुप्रीया ताईंना या मतदार संघाने पवारांचा बालेकिल्ला म्हणूनच नेतृत्वाची संधी दिलेली होती संसदेत त्यांनी चांगली भाषणे केली याचे कौतुक मतदारांना निश्चित असेल देखील. पण आता परिस्थिती बदलली आहे आणि काही समस्या मात्र तशाच आहेत या मतदार संघात पिण्याच्या पाण्याची समस्या काही ठिकाणी आहे, तसेच इथले लोक रोजगारासाठी बाहेरगावी जातात. नवले ब्रिज चा अपघाती ब्रिज म्हणून सारखा उल्लेख होतो आणि खडकवासल्यात धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी ओरड हि होत असते.रिंग रोड च्या भू संपादनाचा विषय असेल पुरंदरच्या विमानतळाचा विषय असेल असे अनेक विषय अजूनही व्यवस्थित हाताळण्याची गरज आहे .सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आता सुनेत्रावाहिनी यांच्याकडे मतदार या मतदारसंघाचे नेतृत्व देतील असे स्पष्ट दिसून येऊ लागल्याचे मानकर यांचे म्हणणे आहे. अजितदादांच्या साथीने वहिनी हे सारे प्रश्न आपल्या पहिल्याच टर्म मध्ये लीलया सोडवू शकतील असाही विश्वास त्यांना वाटतो आहे. जो मतदारांमध्ये आपल्याला दिसून आला असे ते म्हणालेत.
पुण्याच्या कॉंग्रेस भवनाचा बदललेला चेहरा कॉंग्रेसचे परंपरागत मतदार देखील स्वीकारणार नाहीत .
महाराष्टातीलच नव्हे तर पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील अजितदादांच्या नेतृत्वाचाच विजय निश्चित होईल असे सांगून पुणे लोकसभा मतदार संघाच्या बाबत बोलताना दीपक मानकर म्हणाले ,भाजपचे मुरलीधर मोहोळ येथील निवडणूक सहज सरळ जिंकतील असा आपल्याला विश्वास आहे.भाजपचा प्रमुख विरोधक कॉंग्रेसची अवस्था खूपच कठीण होऊन बसली आहे. ज्या कॉंग्रेसने स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लिहिला त्या कॉंग्रेसच्या नशिबी अशी अवस्था येणे दुर्दैवी आहे,पण ती आणली कोणी याचा विचार याही निवडणुकीत पुन्हा स्पष्ट होईलच.कॉंग्रेसकडे परंपरागत मतदार होता आणि आहे यात दुमत नाही पण दिवसेंदिवस तो आता कमी कमी होता चालला आहे . याचे आत्मपरीक्षण कोणी करत नाही. कॉंग्रेसला भाजपने संपविले नसून कॉंग्रेसला कॉंग्रेस मध्येच असणाऱ्या नेत्यांनी संपविले आहे असे माझे मत आहे.आज बदललेला कॉंग्रेस भवनाचा चेहरा पहा तो कोणताही सज्जन चांगला माणूस मग तो पुरुष असो कि स्त्री असो त्यास भावणार नाही .कॉंग्रेस चा जुना कार्यकर्ताही आता कॉंग्रेस भवन ला जायला नको म्हणतो, सगळीकडे नुसती ठेकेदारांची बजबजपुरीच दिसून येते आहे. एका मराठा आयएएस अधिकाऱ्याला कानफटात लगावणे , चप्पल फेकून मारणे असे प्रकार ठेकेदारांनी याच कॉंग्रेसच्या सहाय्याने येथे केलेत हे मराठा समाज देखील विसरणार नाही. पवार साहेबांनी येथे नेतृत्व सोपविलेल्या तथाकथित नेत्याचे जे आज गुणगान गाताहेत त्याने नेमके राजकारण कसे नासविले ते गाडगीळ आणि टिळकच जाणून नाहीत तर उभ्या देशाला संबधित नेत्याचे कर्तुत्व ठाऊक आहे त्याच्यानंतर तर सामुहिक नेतृत्वाने आणखीच बजबजपुरी करून ठेवली . त्यांच्यात जणू रेसच लागली आणि या रेस मध्ये ते सामान्य जनतेपासून दूरवर गेले .आणि म्हणून भाजपचा पर्याय लोकांनी स्वीकारला. अजूनही कॉंग्रेसमध्ये निष्ठेला, प्रामाणिकपणाला योग्य सन्मान नाहीआणि किंमत नाहीच.’ XXX मेहरबान तो ××× पहिलवान ‘अशा अवस्थेत येथे निवडणुका होत आहेत .