सध्या पिण्यासाठी ठेवलेले पाणी विसर्जनासाठी सोडणार …

Date:

पुणे – अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी सध्या पिण्यासाठी ठेवलेले खडकवासला धरणातील  80 दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी  दिली. “”दरवर्षी खडकवासला धरणातून 36 तास नदीमध्ये पाणी सोडले जाते. हे पाणी सुमारे 0.15 टीएमसी इतके सोडण्यात येत होते. या वर्षी धरणे निम्मीच भरली असल्यामुळे 80 घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. ते सुद्धा फक्त 12 तासच नदीत पाणी सोडले जाणार आहे. सकाळी आठ ते रात्री 11.30 पर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीच्या पातळीत साडेतीन ते चार फूट वाढ होणार आहे.‘‘ हे पाणी शहराला एक दिवसासाठी पुरेल इतके असणार आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी खराडी येथे अडविले जाणार असून ते पाणी मुंढवा जॅकवेलद्वारे पुन्हा शेतीसाठी सोडण्यात येणार असल्याचेही बापट यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, जिल्हाधिकारी सौरभ राव आदींसह सर्व राजकीय पक्षांचे गटनेते उपस्थित होते. 
पिण्याव्यतिरिक्त धरणातून पाणी सोडण्यासाठी राज्य सरकारच्या मान्यतेची आवश्‍यकता आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा झाली असून, विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी राज्य सरकराकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हे पाणी सोडण्यात येणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...