पुनर्वसित प्रत्येक गावाचा पुन्हा आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

यवतमाळ : सिंचन प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या गावांचे पुनर्वसन करताना त्या‍ गावांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करुन दिल्या जातील. त्यासाठी जिल्ह्यात पुनर्वसित गावांचा पुन्हा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बेंबळा सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बेंबळा प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, आमदार सर्वश्री अशोक ऊईके, मदन येरावार, राजु तोडसाम, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजु नजरधने, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते.

पुनर्वसित गावातील पायाभूत सुविधांचा एक महिन्यात आराखडा तयार करा. त्याप्रमाणे गावांचे अंदाजपत्रक करुन निधी उपलब्ध करुन देऊ. पुनर्वसित गावात पाणी, रस्ते, नाल्या, वीज आदी सुविधा चांगल्या पद्धतीने निर्माण केल्या जातील. सुविधा निर्माण झाल्यानंतर त्याची पाहणी केली जाईल. अपूर्ण व निकृष्ट सुविधा दिल्यास संबंधीत अधिकाऱ्यास दोषी धरण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धामक गाव शंभर टक्के पुनर्वसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन जागेत या गावाचे पुनर्वसन केले जाईल. सदर गाव मॉडेल गाव करण्याचा प्रयत्न आहे. घुईखेड येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडविण्यासोबतच पुनर्वसित गावांना परिपूर्ण पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत आग्रह राहणार आहे. बेंबळा प्रकल्पाचे काम तीन वर्षात नियोजित पद्धतीने पूर्ण करु. पाटचऱ्या झाल्याशिवाय शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार नाही. त्यामुळे बेंबळा प्रकल्पांतर्गत पाटचऱ्याचे जाळे निर्माण करण्यावर भर राहणार आहे.

शासनाने गेल्या काही दिवसात जिल्ह्यात हजारावर सिंचन विहीरी पूर्ण केल्या आहेत. शेततळ्याचे काम यापुढे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येईल. यातून शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. शासनाने शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत अन्न, आरोग्य, शिक्षण यावर भर देण्याचा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात प्रत्येकास प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ मिळेल, असे नियोजन असून त्यासाठी योग्यप्रकारे निधीचे वाटप केले जाईल.

शासनाने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत पाच टक्के आरक्षणाची तरतूद केली होती. परंतू या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या नाही. याबाबत शासन अभ्यास करीत असून प्रकल्पग्रस्तांना नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कुठल्या मार्गाने दिलासा देता येईल, याचा प्रयत्न सुरु आहे. शासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. या माध्यमातून निश्चितच दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केले.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाचे प्रयत्न – संजय राठोड
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, गेल्या एक वर्षात शासनाने विविध कल्याणकारी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करीत आहे. जलयुक्त शिवार अभियान शासनाचा अतिशय महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. याद्वारे शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. शासनाचे यवतमाळ जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. यापुढेही ते राहणार आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...