नथुराम गोडसेने गांधींऐवजी नेहरूंना मारायला हवे होते…

Date:

तिरुवनंतपुरम – ‘महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसेने महात्मा गांधींऐवजी पंडित नेहरूंना मारायला हवे होते,’ असे खळबळजनक मत भाजपचे नेते गोपालकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘केसरी’ या मुखपत्रातील लेखात मांडले आहे.
आतापर्यंत महात्मा गांधींमुळे देशाची फाळणी झाली असे म्हणणाऱ्यानी आता …. ; पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वार्थी राजकारणामुळेच देशाची फाळणी झाली. त्यांना महात्मा गांधींविषयी काडीचेही ममत्व नव्हते’ असे म्हटल्याने लोक अचंबित होत आहेत ‘केसरी’च्या १७ ऑक्टोबरच्या अंकात हा लेख प्रकाशित झाला आहे. गोपालकृष्णन यांनी केरळच्या चालाकुडीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी लिहिले आहे की, ‘सर्व मोठ्या राष्ट्रीय आपत्तींचे कारण नेहरूंचा स्वार्थ हेच होते. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी फाळणी आधीची ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि गोडसेच्या विचारांचा अभ्यास केला असता तर गोडसेने चुकीच्या व्यक्तीला मारले, या निष्कर्षावर ते पोहोचले असते.’
काँग्रेसने या लेखाबद्दल संघावर कडाडून टीका केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी केली.
लेखात म्हटले आहे की, गांधीहत्येत संघाचा हात नव्हता. गोडसे नेहरूंपेक्षा चांगला होता. त्याने सन्मानपूर्वक झुकल्यानंतर गांधीजींना गोळी मारली. समोर झुकायचे आणि पाठीत सुरा खुपसायचा असे नेहरूंसारखे त्याने केले नाही.’गोपालकृष्णन यांच्या लेखावर चौफेर टीका होत असताना त्याचे समर्थन ‘केसरी’चे संपादक एन. आर. मधु यांनी केले आहे. ‘नेहरूंचे राजकारण, त्यांची धोरणे यावर आम्ही सातत्याने टीका करीत आलो आहोत. आणि या लेखात नेहरू यांना शारीरिकदृष्ट्या टार्गेट करा, असे कुठे म्हटले आहे?’, असा उलटाच प्रश्न मधु यांनी केला! या प्रकरणी आवश्यक असल्यास कारवाई करण्याचे आदेश केरळच्या गृहमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...