अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहाचे काम 20 जिल्ह्यात प्रगतीपथावर- एकनाथराव खडसे

Date:

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृह बांधण्याचे काम 20 जिल्ह्यात प्रगतीपथावर असून नऊ जिल्ह्यात वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत. या वसतीगृहांच्या बांधकामासाठी निधीची कमतरता नाही, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरूवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य ख्वाजा बेग यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. खडसे म्हणाले, अल्पसंख्याक समाजातील मुला-मुलींसाठी वसतीगृहे बांधण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. राज्यातील अल्पसंख्याक बहूल भागात अथवा तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या 25 टक्के आहे, तेथे वसतीगृह बांधण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.

सध्या अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या वसतीगृहासाठी 20 जिल्ह्यात जागा उपलब्ध असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. वसतीगृहासाठी जागा शहरात असावी अथवा शहरालगत असावी, असे सांगून श्री. खडसे म्हणाले, अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी असलेल्या वसतीगृहामध्ये प्रवेश देताना 70 टक्के प्रवेश अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी तर 30 टक्के प्रवेश उर्वरित समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिला जाईल.

यवतमाळ येथे वसतीगृहासाठी जागा उपलब्ध झाली असून तेथे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्यात येईल. तसेच रत्नागिरी येथील मुलींसाठीच्या वसतीगृहात याच वर्षीपासून प्रवेश देण्यात येईल, असेही श्री. खडसे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे, हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.

आणेवारी पद्धतीत बदल करण्याबाबत सहा महिन्यात सकारात्मक निर्णय- एकनाथराव खडसे
आणेवारी पद्धतीत बदल करण्याबाबत सहा महिन्यात राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यात गत हंगामातील कापूस व धान पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबतचा प्रश्न सदस्य संदीप बाजोरीया यांनी उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना श्री. खडसे बोलत होते. ते म्हणाले, ब्रिटीश काळापासून सुरू असलेली आणेवारी पद्धत बदलण्यासाठी राज्य शासनाने कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने आणेवारी पद्धत, पीक पद्धत, जमिनीचा पोत, भौगोलिक परिस्थिती आदीबाबतचा अभ्यास केला असून या समितीच्या शिफारसी मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येतील. त्यानंतर येत्या सहा महिन्यात आणेवारी पद्धत बदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

गतवर्षीच्या खरीप हंगामातील बाधीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून 254 कोटी रुपयांची मागणी होती, त्यानुसार रक्कम वितरीत करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांचे बॅंक खाते आणि वारशाबाबत वाद असल्याने त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही. हा निधी शासनाकडे परत आला नसून तो बॅंकेत जमा आहे. शेतकऱ्यांचे बॅंक खाते उघडल्यानंतर तो त्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या 10 वर्षात धान खरेदी ज्या पद्धतीने होत होती त्याच पद्धतीने यावर्षी धान खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, अनिल तटकरे, हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.

मोठ्या प्रमाणावर कोल ब्लॉक मिळाल्याने वीज निर्मितीला चालना- चंद्रशेखर बावनकुळे
केंद्र शासनाकडून राज्याला यावर्षी मोठ्या प्रमाणावर कोल ब्लॉक मिळाला असून त्यामुळे वीज निर्मितीला चालना मिळेल, अशी माहिती ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य ॲड. जयदेव गायकवाड यांनी राज्यातील वीज निर्मितीकरिता कोळसा खाणी महाराष्ट्रात राहण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण आधीपासूनच कर्नाटक राज्याला मिळाली आहे. यावर्षी केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून गारे पाल्मा सेक्टर 2 ही कोळसा खाण आवंटीत करण्यात आली आहे. वेस्टर्न कोलफिल्ड इंडियाकडून नियमित कोळसा उपलब्ध होत आहे.

राज्यातील ए,बी, सी आणि डी प्रकारच्या फिडरवर भारनियमन केले जात नाही, असेही श्री. बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शरद रणपिसे, जयंत पाटील, श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी भाग घेतला.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...