पुणे- ‘सबसे बडा खिलाडी’ अशी एकेकाळी ओळख असलेला आणि ‘मी म्हणजे पुणे’ अशी शेखी मिरविलेला पण काळाच्या राजकारणात दूर फेकला गेलेला तथाकथित -नेता सुरेश कलमाडी यांचा अलीकडच्या काळात सणासुदीच्या निमित्ताने वाढणारा जनसहभाग आता केवळ कार्यकर्त्यांचा औत्सुक्याचा भाग राहिला नसून , स्थानिक मंत्री दिलीप कांबळे यांच्या त्यांच्यासमवेत च्या आणि ‘ जनसहभागाची ‘ दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे वृत्त आहे .
महम्मदपैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकित (जूलुस) मध्ये सुरेश कलमाडी हे आज माजी गृहराज्यमंत्री आणि शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे, आणि भाजपचे विद्यमान मंत्री दिलीप कांबळे यांच्या समवेत दिसून आले . अर्थात दिलीप कांबळे हे फार थोडा वेळ कलमाडी यांच्यासमवेत या मिरवणुकीत होते . पण नगरसेवक अविनाश बागवे व दयानंद अडागळे आक्रमभाई शेख व इतर कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी बराच काळ कलमाडी यांच्या समवेत मिरवणुकीत होते .कॉंग्रेस मध्ये अजूनही स्थानिक पातळीवर कलमाडी यांचे चाहते राजकारणात बरेच आहेत . केवळ कॉंग्रेस मध्येच नाहीत तर अन्य पक्षात हि त्यांचे चाहते आहेत . तत्कालीन नेते विठ्ठलराव गाडगीळ यांना हटविण्यासाठी कलमाडी यांनी निस्वार्थी राजकारणाला व्यवहारिक मार्गावर नेल्याने सुरुवातीला अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती . पण काळ पुढे सरकला तसा त्यांच्यावर टीका करणारी मंडळी देखील त्यांच्या समवेत दिसू लागली .कलमाडी यांनी राजकारणाची दिशा अशी बदलून ठेवली कि त्याच मार्गावर कलमाडी नसतानाही राजकारण स्थिरावले .आता पुण्याचा नेता कोण ?असा प्रश्न उपस्थित होत असताना ,नेत्या अभावी महापालिकेच्या कारभाराची दैना होत असताना , कलमाडी यांचे जनतेत वाढलेले येणे जाणे अनेकांच्या भुवया उंचावून टाकीत आहेत . २०१९ च्या निवडणुकीसाठी एकीकडे कॉंग्रेस मध्ये मोहन जोशी, अभय छाजेड सारखी मंडळी इच्छुक असताना भाजपा मधून बापटांना तुम्ही आता मंत्रिपद सोडा ,लोकसभेकडे लक्ष घाला ,असा सूर लावला जात असताना पैगंबर जयंतीच्या निमित्ताने कलमाडी यांचे जनतेत मिसळणे राजकीयदृष्ट्या काही रंग उधळणार काय ?अशी निव्वळ चर्चा सध्या तरी राजकीय गप्पांमध्ये करमणुकीचा रंग भरते आहे .