पुणे- कात्रज येथील महादेवनगर मधील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन जे आज होणार होते ते पुढे का ढकलले ? यावरून राजकीय कलगीतुरा रंगत असताना , राष्ट्रवादी ने महापौरांनी घेतलेल्या या निर्णयाने लोकांना आणखी काही दिवस पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचा आरोप केला आहे. तर असे काही होणार नाही तेथून पाण्याचे वितरण सुरु केले आहे .असा दावा करत या भागातील पाण्याच्या प्रश्नावर एकीकडे उद्घाटन होत असताना दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन कसे केले ? यावर मात्र या दोन्ही गोष्टी परस्परांशी संबधित नसल्याचा दावा हि महापौरांनी केला आहे. या संदर्भातील हकीकत अशी कि , कात्रज येथील महादेव नगर मधील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन ९ तारखेला होणार होते त्यासाठी महापौरांनी उपमुख्यमंत्री यांना पत्र हि दिले होते . मात्र याच दिवशी येथील पाण्याच्या प्रश्नावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी जोरदार आंदोलन केले ज्यावरून त्यांना तुरुंग वारी घडली . एकीकडे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन होत असताना दुसरीकडे आंदोलन करून भाजपने राष्ट्र वादीच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी कडून करण्यात येतो आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष आणि या परिसरातील विद्यमान आमदार चेतन तुपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शी ‘माय मराठी’ ने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पहा नेमके कोण काय म्हणाले …..