Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सीबीआयला यश का नाही ?

Date:

पुणे- पूर्वीच्या काळात पोलिसांचा धाक तर होताच ,पण सीआयडी म्हटले तरी भल्याभल्यांची टरकत.. सीबीआय तर बहुधा कोणाला माहितीही नसावे आणि इडी तर लोकांना आता अलीकडे माहिती पडले असावे . तर .. मुद्दा हा कि सीआयडी नावाचीच दहशत होती . वेगवेगळे वेषांतरे करून , स्वतःची ओळख लपवून , कित्येक महिने एखाद्या वेगळ्याच रुपात वावरत हे सीआयडी गुन्हेगारांचा खेळ खल्लास करून टाकीत . सीआयडी तर सोडा आता सीबीआय चा हि धाक उरलाय का ? हा प्रश्न विचारावा लागेल अशी स्थिती आहे. ज्याच्या हाती ससा तोच पारधी .. तसे ज्याची सत्ता त्याचेच पोलीस, त्याचीच सीआयडी आणि त्याचेच सीबीआय अशी स्थिती झाल्यावर होणार तरी काय ? त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारांचा शोध घेण्यात सीबीआयला यश का नाही? हा प्रश्न हि तसा दुर्लक्षित ठरणाराच आहे. बरे दाभोलकरच का ? असे असंख्य मृतात्मे आहेत ज्यांना न्याय याच स्थितीमुळे मिळू शकलेला नाही . जेव्हा देशातला नागरिक मेंढराप्रमाणे हाकेल तिकडे पळेल , अत्याचारी का असेना पण शक्तीधारी व्यक्तीला सलाम ठोकेल , राज्य कोणाचेही असेना ,त्याला त्याचे घेणे देणे नसेल , आणि तो केवळ आपली जहागीरदारी कशी राहील यात रमणार असेल तर सीबीआय तरी काय करू शकणार आहे? ती हि याच समाजात याच वृत्तीच्या सावलीत वाढलेली माणसे आहेत .

बरे सामान्य माणूस किंवा सामान्य गुन्हेगार असता तर आजवर सीबीआयनेच काय ,पोलिसांनी किंवा सीआयडी ने त्यांचा कधीच पर्दाफाश करून टाकला असता . जिथे राठी हत्याकांडातील आरोपी पकडले जातात ,’सात च्या आत घरात ‘ ची जक्कल सुतार केस चातुर्याने सोडविली जाते असं पुणे नावाचं नामांकित शहर आहे, आणि तिथे दाभोळकर नावाचं एक वादळ आहे ते असे इतक्या सहजासहजी कोणा सामान्य माणसाला संपविता येईल ? जिथे दाभोळकरांचा खून केला गेला ते ठिकाण जंगलात नाही , तिथून जवळच भली भली कार्यालये,भल्या भल्यांची निवासस्थाने असलेला भाग आहे. सीसीटीव्ही आणि अनेक नजरांचे जाळे इथे कायमचेच विखुरलेले असते .तरीही एवढी हिम्मत … अशा ठिकाणी दाभोळकरांची हत्या करणे . हे सोपे आणि सामान्य माणसांचे काम निश्चितच नव्हतेच . ज्या दाभोलकरांनी महाराष्ट्र च नव्हे तर देशातल्या अंधश्रद्धेला उखडून फेकून, नवा, मेंढरांप्रमाणे नसेल असा स्व विचारी असणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला,त्यासाठी अनेक आव्हाने पेलली , अनेक वादळांना ते सामोरे गेले, त्या दाभोळकरांना असे ठार मारणे सहजसोपे निश्चित नाही . नक्कीच यासाठी मोठे लागेबांधे असावेत . व्यवस्थेतील फितुरांच्या मदतीचा आसरा घेतला असावा . आणि खरे मारेकरी नंतर दाभोळकर यांच्याच पाठीमागे धाडण्याचे कारस्थान देखील झाले असावे अशा कल्पना , टाळता येऊ शकणाऱ्या नाहीत . एकामागे एक पुरावे नष्ट करण्याचे कारस्थान झाले नसेल कशावरून ?

या साऱ्या चर्चा ,शक्याशक्यता ,संशय याला खरेतर काहीही अर्थ एवढ्या वर्षांनंतर उरत नाही . जिथे सीबीआय खुन्यांच्या सूत्रधारापर्यंत वर्षानुवार्षे पोहोचू शकत नसेल . तिथल्या कायदा सुव्यव्स्थेबाद्द्ल मत व्यक्त करणेही धाडसाचेच ठरेल . काही तरी मर्यादा हवी कि नको , एका प्रकरणाचा तपास पुराव्यानिशी किमान ५ वर्षात लावू शकला नाही तर … अशा अधिकाऱ्यांना काय फुकट देशाने पोसत बसायचे काय ? आणि त्यांनी हि जोरात मोठ्या तोऱ्यात मिरवत बसायचे काय ? अशा अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करीत ठोस कारवाई व्हायलाच हवी . आणि त्यासाठी त्यांना राजकीय दबावापासून प्रथम मुक्त करायला हवे … करू शकतो काय हे कोणी ? आंदोलने .. लिखाणे आपण लाख करू, पण वास्तविकता बदलण्यासाठी प्रथम तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला कायदेशीर स्वातंत्र्य , आणि दबाव विरहीत वातावरण आणि संरक्षण देणं सर्वाधिक महत्वाचं आहे. जोपर्यंत हे मिळणार नाही , तोपर्यंत अशा बड्या बड्या केसेस मध्ये खऱ्या खुऱ्या गुन्हेगारांना लटकावता येणार नाही हि वास्तविकता आहे .. आणि ती आपण स्वीकारली पाहिजे .

बाकी राहिलं .. आता पोलिसाचा काय , सीआयडी ,सीबीआयचा काय जो काही धाक असेल तो राजकीय परिस्थितीवर अवलंबून असेल . हे स्पष्ट असताना आता बड्या बड्या केसेस मध्ये तरी खऱ्याखुऱ्या तपासाची अपेक्षा बाळगावी काय ? हा खरा प्रश्न आज आ वासून पुढे उभा आहेच .त्याचे उत्तर हि फारसे अवघड कोणाला वाटणार नाही .

  • शरद लोणकर
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजप नेते उज्ज्वल निकम राज्यसभेवर खासदार:राष्ट्रपतींनी 5 सदस्यांना केले नियुक्त

पुणे -राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी चार नवीन नामांकित सदस्यांची नियुक्ती केली...

कोथरूडमध्ये सात्यकी सावरकर आयोजित ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीने पाडले बंद

नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी अवमानकारक संवाद असल्याचा...

यूनेस्को हेरिटेज वारसा, जाहिरातीतुन नव्हे तर कृतीने जपण्याची गरज..काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

रयतेच्या राजांना अभिप्रेत कल्याणकारी लोक-राज्याची संकल्पना वास्तवात उतरवावी. बारसू रिफायनरी...

पुणे: बीडीपी झोन निश्चिती संदर्भात नियुक्त समितीने व शासनाने पर्यावरण संवर्धन आणि बाधीत जनतेच्या भावनांचा विचार करावा

BDP करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने...