पुणे- ‘अब्दुल सत्तार यांच्या विधानाचे समर्थन करणार नाही. पण खोके हा विषय कसा सुरू झाला? ते देखील योग्य नाही. शिवसेना यापूर्वी फुटली नव्हती का? नारायण राणे, छगन भुजबळ यांना कोणी फोडले? त्यावेळी खोके नसतील, पेट्या होत्या. त्यामुळे एकांगी आरोप करायला नको. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पक्षात घुसमट होत होती, त्यातून ते बाहेर पडले. त्यामुळे हे आरोप बंद व्हायला हवे.’या सोबतच खोके या विषयावरून एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करणे हे चुकीचे असून,मात्र या सत्ता समीकरणमध्ये अस काही झालेले नाही. असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील राजकीय संस्कृती हा एक चिंताजनक विषय झाला असून, सर्व पक्षाच्या लोकांनी यावर बसून काय बोलले पाहिजे काय नाही हे ठरविणे आवश्यक आहे. दिलगिरी व्यक्त केली की हा विषय संपला पाहिजे असं वाटते . जुन्या काळातील यादी बाहेर काढल्यास अब्दुल सत्तार यांचे समर्थन होईल. जे मला करायचे नाही. या सोबतच खोके या विषयावरून एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करणे हे चुकीचे असून,मात्र या सत्ता समीकरणमध्ये अस काही झालेले नाही. असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.ते म्हणाले,’ माझ्या गुरूने एक चूक करायला शिकवले आहे .मात्र एक चूक वारंवार घडत असेल तर ते चुकीच आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्याबाबत मुख्य नेते पाहतील काय करायचे ते. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने राजीनाम्याची मागणी करू नये असे माझे अजिबात म्हणणे नाही .पण आता माफी मागितली असेल तर हा विषय संपवला पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.हर हर महादेव चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवायचा असेल त्यांनी कायदा हातात घेणे योग्य नाही.