मुख्यमंत्री आज दुपारी 1.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक घटना घडत आहेत. यामध्ये कंगना राणावत, अर्णब गोस्वामीचे प्रकरण आहेत. यासोबतच गोस्वामीला अटक झाल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. तसेच आणीबाणीची आठवण करुन दिली जात आहे. याविषयावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले होते की, लवकरच राज्यातील सर्वच बंधने ही शिथिल करण्यात येतील. सध्या राज्यात सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण महाराष्ट्रातली मंदिरे कधी उघडणार असा प्रश्न भाजपा आणि मनसेकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. भाजपकडून यासाठी अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. त्यावरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.