पुण्यात एल्गार परिषदेत केलेल्या आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी शार्जील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शार्जील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो कुठेही असला तरी त्याला अटक करू असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.
पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असे देशमुख यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.