राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिलं पत्र
मुंबई-विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असाही गौप्यस्फोट केला आहे.दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावलं जात आहे
शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेच्या खासदाराने पत्रात म्हटले आहे – ठाकरे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे.एवढेच नाही तर त्यांनी अंमलबजावणी संचालनालयावरही (ईडी) गंभीर आरोप केले आहेत. ईडीच्या माध्यमातून मला गोवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. 17 वर्षांपूर्वी मी जमीन खरेदी केली होती, त्या प्रकरणी ईडीने तपास सुरू केला आहे.
उपराष्ट्रपतींसोबतच राऊत यांनी या पत्राची प्रत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मलिकार्जुन खर्गे, आप नेते संजय सिंह, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांच्यासह अनेक नेत्यांनाही पाठवली आहे. सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही राऊत यांनी केले.
सरकार पाडण्यास नकार दिल्याने किंमत मोजावी लागेल अशी धमकी दिली
संजय राऊत यांनी असेही नमूद केले आहे की, काही काळापूर्वी काही लोकांनी महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला होता. जेणेकरून महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, ज्यावर संजय राऊत यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मदत न केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकीही या लोकांनी दिल्याचे राऊतांनी सांगितले.. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याशिवाय महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांनाही पीएमएलए कायद्यांतर्गत तुरुंगात पाठवल्याचे सांगण्यात आले. या सगळ्यासाठी आपण भीक मागितली नसल्याचं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
17 वर्षे जुन्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न
संजय राऊतांनी खूप गंभीर केला की, भाजप विविध डावपेचांचा वापर करुन शिवसेना सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पत्रात म्हटले की, ‘मी आणि माझ्या कुटुंबाने अलिबागमध्ये काही जमीन खरेदी केली आहे. ही जमीन 17 वर्षांपूर्वी आम्ही खरेदी केली होती. ही जमीन सुमारे एक एकर आहे. आता मी ज्यांच्याकडून जमिनी घेतल्या आहेत त्यांनाही धमकावले जात आहे. ईडीच्या कारवाईच्या भीतीने त्यांना माझ्याविरोधात बोलण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांना काही पैसे देखील देण्यात आले आहे.’
भाजप ईडीसारख्या एजन्सीचा गैरवापर करत आहे
राऊत यांनी पत्रात पुढे लिहिले की, ‘मी माझ्या राजकीय कारकिर्दीला तीन दशकांपूर्वी सुरुवात केली होती. मी अगदी सुरुवातीपासून शिवसेनेत आहे. सध्या महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. तसेच शिवसेनेची भाजपसोबत 25 पेक्षा अधीत वर्षांपासून युती होती. 25 वर्षांत दोन वेळा शिवसेना-भाजप युतीचे सरकार देखील आले आहे. काही वैचारिक मतभेदांमुळे आम्ही वेगळे झालो. मात्र, आम्ही भाजपपासून फारकत घेतल्यानंतर समोर आले की, भाजप शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी ईडी सारख्या एजेंसीचा गैरवापर करत आहे. शिवेसना नेत्यांना निशाणा बनवला जात आहे. केवळ खासदार नाही तर शिवसेनेच्या आमदारांना देखील निशाणा बनवले जात आहे. कारण ते शिवसेनेत आहे यामुळे त्यांची ईडीद्वारे चौकशी केली जात आहे.
“मुलीच्या लग्नाच्या खर्चाची चौकशी”
तसंच मुलीच्या लग्नाच्या खर्चासंबंधी चौकशी केली जात असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. “माझ्या मुलीचं २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न झालं. ईडी आणि इतर तपास यंत्रणा डेकोरेटर तसंच इतर कंत्राटांना समन्स बजावत असून धमकावत आहेत. माझ्याकडून ५० लाख रोख मिळाले असा जबाब देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांचा छळ केला जात आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
“ईडीने बेकायदेशीरपणे २८ जणांना घेतलं ताब्यात”
“ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी आतापर्यंत बेकायदेशीरपणे २८ जणांना ताब्यात घेतलं आहे. यांनी ईडीच्या कार्यालयात बोलावून धमकावलं जात आहे. या सर्वांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं असून तासनतास बसवलं जात आहे. जर माझ्याविरोधात जबाब दिला नाही तर घऱी जाऊ देणार नाही आणि अटक करु इथपर्यंत धमकावलं जात आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी तर काही जणांकडे त्यांच्या वरिष्ठांनी माझ्याविरोधात रचलेला कट असल्याचं मान्य केल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी यापुढेही आपण सभागृहात आणि सभागृहाबाहेर बोलत राहणार असल्याचं म्हटलं आहे.