पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जातीने लक्ष घालून महापालिकेत २३ गावांचा समावेश केल्याने आता खरा या गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे महापालिकेतील विरोधीपक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या,’ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका हददीत २३ गावांचा समावेश करणेबाबत शासनाने निर्णय केला असून याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही सुरु झाली आहे.. हा निर्णय नक्कीच अभिनंदनीय असून समाविष्ट २३ गावातील विकासकामांचा मार्ग मोकळा झालेला आहे. याठिकाणी नियोजनबध्द विकास होणे शक्य होणार आहे. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा ; आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचावणार असून शहरीकरणाचा वेग वाढणार आहे. पुणे शहर हे आता ख-या अर्थाने देशातील सर्वात मोठे शहर झाले आहे. यानिर्णयासाठी .अजितदादा पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांचे व महाविकास आघाडी सरकारचे जाहिर आभार !!!