पुणे-आज झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी अचानकपणे राष्ट्रगीत लावून सभा संपविण्यात (तहकूब )करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
विरोधकांना बोलूनच द्यायचे नाही. गार्हाणी मांडून द्यायची नाहीत .किंवा काही गोष्टींकडे काना डोळा करायचा या वृत्तीने अचानक राष्ट्रगीत लावण्यात आले . आणि यावेळी खुद्द व्यासपीठावर आणि सभागृहात अनेक जण बोलत होते . काहींचे हातवारे तर काहींचे चालणे सुरु होते . आणि विशेष म्हणजे विरोधकांनी मांडलेल्या दुसऱ्या तहकुबी चे काय ? हा प्रश्न उपस्थित होता . विरोधकांनी तहकुबी तर मांडली होती . ती स्वीकारली कि नाही ? हे देखील न सांगता सभा पहिल्या सूचनेनुसार तहकूब करण्यात आली . जे कि आपणही तहकुबी मांडत आहोत असे सभागृहात त्या अगोदर कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले होते.
शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार , विपक्ष्नेत्या दिपाली धुमाळ आणि बागुल यांनी हि दुसरी तहकुबी मांडली होती जिचे वाचन हि त्यांनी सभागृहात केले होते. .
याबाबत पहा शिवसेनेचे सुतार , कॉंग्रेसचे बागुल आणि राष्ट्रवादीच्या धुमाळ यांनी काय म्हटले आहे.