पुणे- मार्च महिन्याच्या कार्यपत्रिकेवरील अनेक खर्चिक विषय मंजूर केले ,पण अजिबात खर्च न करता केवळ शासनाकडे पत्रव्यवहार सुरु करून प्रकल्पाची प्रोसिजर सुरु करणारा प्रस्ताव म्हणजेच स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव पुण्याच्या महापौरांनी जाणून बुजून रखडवून ठेवल्याचा आरोप आज राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी नितीन कदम यांनी येथे केला. प्रसंगी भाजपच्या राजकारणाला ओळखून आयुक्तांनी दक्षिण पुण्याचा हा महत्वाचा प्रकल्प मार्गस्थ करण्यासाठी शासनाकडे आपण हून स्वतःच्या अधिकारात पत्र पाठवावे अशी मागणी हि त्यांनी येथे केली .
त्या म्हणाल्या , राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अजित पवार ,सुप्रिया सुळे हे पूर्वीपासून पुण्यात मेट्रो व्हावी आणि सर्व पुणेकरांना तिचा फायदा व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. पण भाजपने सुरुवातीला मेट्रोचा निधी नागपूरला पळविला , तरीही आमचे नेते आणि आम्ही पाठपुरावा सुरूच ठेवला . आता स्वारगेट ते कात्रज च्या प्रस्तावावर केवळ काही कागदपत्रे ,पत्रव्यवहार शासनाशी करायचा आहे . म्हणजेहा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजितदादा च पुढे नेणार आहेत . सध्या या साठी महापालिकेला कोणताही खर्च करायचा नाही . तरीही महापौरांनी मार्च महिन्याच्या कार्यपत्रीकेवरील हा विषय तिष्ठत ठेवला आहे. वास्तविक पाहता या महिन्यातील कार्य पत्रिकेवरील अनेक खर्चिक विषय मंजूर करण्यात आले . मात्र हा प्रस्ताव जाणून बुजून पुढे ढकलण्यात आला. ऑनलाईन सभेद्वारे देखील हा विषय पुकारून त्यास मान्यता घेता आली असती . पण त्यांनी तसा कोणताही प्रयत्न केला नाही.
या प्रकरणी तातडीने त्यांनी कार्यवाही करावी अन्यथा आयुक्तांनी आपल्या अधिकारात या प्रकरणी स्वत शासनाशी कागदोपत्री संपर्क साधावा म्हणजे प्रकल्प वेळेत पूर्ण होईल .