पुणे-
अद्वैत क्रिडा केंद्र आणि नाट्य – चित्र कला अकादमी यांच्या सुंयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अद्वैत क्रिडा केंद्र नवीपेठ पुणे येथे काव्य मैफिलचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. विजयसिंह साळुंखे कवी संमेलनाचे अध्यक्ष कवीवर्य बाबा ठाकूर हे होते . प्रमुख पाहुणे डॉ. मदन कोठुळे हे होते . शिवरायांचे विचार आणि संस्कार समाजात पेरण्यासाठी कवींचे मोलचे योगदान आहे असे मत ॲड. साळुंखे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले . डॉ. मदन कोठुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे वैभव आहे असे सांगून हे वैभव जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे . आणि ती आपण पार पाडली पाहिजे .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रमुख्य पाहुण्यांच्या हस्ते पुष्पमाला घालण्यात आली .
कवयित्री अलका जोशी आशा शिन्दे गुरुराज गर्दे ॲड. रामचंद्र पाचुंदकर
विजय जाधव अनिल कांबळे संजय मरळ यांनी बहरदार रचना सादर केल्या . कवी संमेलनाचे अध्यक्ष बाबा ठाकूर यांनी आई वरची रचना सादर करून रसिकांच्या काळजाला हात घातला . श्री . युवराज दिसले यांनी आभार प्रदर्शन केले तर लोक साहिात्यिक सीताराम नरके यांनी आपल्या ओघवत्या सुत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली . नाट्य – चित्र कला अकादमीचे अध्यक्ष श्री . सुर्यकांत तिवडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले .