पुये- शिवपूजन, शिवजयघोष आणि राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेवून कात्रज येथील भारती विद्यापीठ परिसरात शिवजयंती मोठ्या साजरी करण्यात आली सामाजिक ऐक्य हाच राष्ट्रीय एकात्मतेचा पाया आहे. तो पाया भक्कम करण्यासाठी एकात्मतेची शपथ घेवून शिवमहोत्सव समितीने शिवजयंती साजरी केली.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, भारती विद्यापीठ परिवार, परिसरातील सर्व शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, वकील संघटना, पत्रकार, महिला मंडळं, शिवप्रेमी विद्यार्थी, शिक्षकांच्या उपस्थित शिवपूजन करण्यात आले. शिववंदना आणि शिवघोषाने परिसर दणाणून गेला. चाटे शिक्षण समुहाचे फुलचंद चाटे,चिंतामणी ज्ञानपीठाचे संस्थापक अप्पा रेणूसे, व्ही.एस. अंकलकोटे पाटील, राष्ट्रशक्ती संघटनेचे ज्ञानेश्वर दारवटकर, बाबा शिंदे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार, गुन्हे निरिक्षक विष्णू ताम्हाणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे शंकर पाटील, संतोष शिंदे, शिंवशंभू प्रतिष्ठानचे महेश कदम, संतोष फरांदे,विलास भणगे, युवराज रेणुसे, डॉ संभाजी करांडे, संदिप लोंढे, दादा देवकर, डॉ संजय यादव, प्रशांत जाधव, राजेश पाटणे, विनोद बंगाळे ,महेश किवडे, गीतांजली जाधव यांच्यासह उपस्थित नागरिकांनी एकात्मतेची सामुदायिक शपथ घेतली. एकात्मता वृक्षाची लागवड यानिमित्ताने करण्यात आली. आमदार भिमराव तापकीर आणि उपस्थित मान्यवरांनी सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिवजयंती ही काळाची गरज आहे. एकात्मतेच्या मार्गाने सर्वांना नेण्याचा शिवमहोत्सव समितीचे कार्य हे एक शिवकार्यच आहे. ते सर्वांनी अंगीकारले पाहिजे. यावेळी उपस्थित मान्यवर, नागरिक, विद्यार्थ्यांनी जयघोष केला.