नवी दिल्ली -गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे.
“सर्वच माध्यमांमधून त्यांनी साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी गिरीश कर्नाड कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांबाबत ते मनापासून बोलायचे. त्यांनी केलेले काम आगामी काळातही लोकप्रिय राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो” असे पंतप्रधान म्हणाले.
कोविंद म्हणाले, "मी अनुभवी अभिनेता, लेखक आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांचे निधन ऐकून दुःखी झालो आहे."
आमचे सांस्कृतिक जग पूर्वीपेक्षा सध्या कमी समृद्ध असे आहे. त्यात कर्नाड यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची अधिक मोठी हानी
होईल.मी त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या कार्याचे अनुसरण करणारे सर्व लोक यांचे हे दुखः लक्षात घेवून दुख्ही झालो आहे. ईश्वर
हे दुखः पेलण्याची शक्ती आम्हास देवो .