मुंबई-फेक टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या AVP (असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट) घनश्याम ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. फेक टीआरपी प्रकरणात पोलिसांनी रिपब्लिकच्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्याची ही पहिली वेळ आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी घनश्याम यांची 30 तास चौकशी केली होती.
अर्णब प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी, अँकरचे पत्र
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीला अटक केल्यानंतर तेथील एका सूत्रसंचालकाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एसए बोबडे यांना पत्र लिहिले आहे. अर्णबला तालोजा जेलमध्ये कुख्यात गुन्हेगारांसोबत ठेवण्यात आले आहे असा दावा त्यांनी केला. सोबतच, सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीची दखल घ्यावी अशी विनंती त्यामध्ये करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, अर्णब गोस्वामीला मुंबई हायकोर्टाने सोमवारी पुन्हा जामीन नकारला. अर्णबला 4 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.