कॅन्सर निर्मूलनार्थ जनजागृती परिषदेचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दादर मध्ये उदघाटन
मुंबई – कॅन्सर या जीवघेण्या आजारावर मात करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. रासायनिक खतांचा वापर करून होणारी शेती कँसर निमंत्रण आहे. रासायनिक खतांमुळे कँसर होतो. त्यामुळे रासायनिक खतांच्या वापरावर बंदी आणण्याची गरज आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना कृषी मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालय तर्फे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार विचार करेल असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.
दादर येथील स्वातंत्र्यविर सावरकर स्मारक सभागृहात कॅन्सर निर्मूलनार्थ जनजागृती परिषदेचे आयोजन आंबागोपाल ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते. या परिषदेचे उदघाटक म्हणून रामदास आठवले उपस्थित राहिले होते. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते संजय खान ; शेखर सुमन; आंबा गोपाल ट्रस्ट चे अध्यक्ष हरीश शेट्टी; सुवर्णा वानखेडे; अभिनेत्री किशोरी शहाणे; ज्येष्ठ अभिनेते डेबू मुखर्जी; लखमेन्द्र खुराणा; ब्रिगेडियर सावंत; जिल्हा अधिकारी मिलिंद बोरीकर; मितुल प्रदीप;हेमंत तांतीया; डॉ माई देशमुख; कुमार जित आठवले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
गरीब;श्रीमंत ; मध्यमवर्गीय कुणालाही कॅन्सर होतो.कॅन्सर चा धोका वाढत आहे. गरीब रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. कॅन्सर झालेल्या रुग्णाला पहिल्या स्टेज वर कळले तर वैद्यकीय उपचारांमुळे रुग्ण बरा होऊ शकतो. मात्र अलिकडे कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे. कॅन्सर रोखण्यासाठी सरकार प्रयत्न सुरू आहेत.शेती मध्ये रासायनिक खते वापरू नयेत त्यासाठी रासायनिक खतांवर बंदी आणण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती साठी कौशल्य विकास मंत्रालया तर्फे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे। सेंद्रिय शेतीच्या प्रचारासाठी आणि रासायनिक शेतीला विरोध करण्यासाठी देशभर जिल्ह्या जिल्ह्यात जनजागृती झाली पाहिजे.केंद्र सरकार ने नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले आहे असे विचार ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून खुमासदार केलेले भाषणाला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.