पुणे- उत्तर प्रदेशात महिलांवर होणारे अत्याचार आणि त्या विरोधात उठणारे आवाज दडपण्याचा प्रकार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून इथे तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे. आज राहुल गांधी यांच्याबाबत आणि पूर्वी प्रियांका गांधी यांच्याबाबत त्यांना अडविण्याचा केलेला पराक्र हा हुकुमशाही आणि दडपशाही स्पष्ट करणारा आहे .देशासाठी बलिदानाची मोठी परंपरा असलेल्या एवढ्या मोठ्या घराण्यातील व्यक्तींना पोलीस अशी वागणूक देतात तर अन्य नागरिकांचे काय होत असेल इथे मोदी सरकारने तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी असे ते म्हणाले.