Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे शहर भाजपाच्या‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे उद्घाटन संपन्न

Date:

पुणे-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.याचा अभियनाचा शुभारंभ आज(मंगळवार) पुणे शहर भाजपाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास खासदार गिरीश बापट, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पुणे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, मुरलीधर मोहोळ, सिध्दार्थ शिरोळे, योगेश टिळेकर यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येन उपस्थित होते. याप्रसंगी भाजपाकडून सर्जिकल स्ट्राईकचे नायक लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, या कार्यक्रमास स्वातंत्र्यवीरांचे कुटुंबीय, शहीदांचे कुटंबियांची देखील उपस्थिती होती.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “स्वातंत्र्याचे हे ७५ वर्ष हा अमृतकाळ आपल्याला एका ध्येयाकडे नेणारा आहे. त्याची सुरुवात ही आपण हर घर तिरंगाच्या माध्यमातून करतोय. एवढंच नाही तर १४ ऑगस्ट रोजी आपल्याला विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळायचा आहे. मनवायचा नाही, पाळायचा आहे. कारण, विभीषिका मनवली जात नाही विभीषिका पाळली जाते.”

तसेच, “आपण सर्वजण अखंड भारतामध्ये विश्वास ठेवणार आहोत. परंतु जोपर्यंत अखंडभारत तयार होत नाही. तोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या मनात हे स्वप्न राहिलं पाहिजे आणि शल्य देखील राहिलं पाहिजे, की हो या दिवशा माझ्या देशाचं विभाजन देखील झालं होतं. इस्त्राइलची भूमी दोन हजार वर्षानंतर ज्यू लोकांना मिळाली होती. आपल्याला दोन हजार वर्ष वाट पाहायची नाही. अखंड भारताचं स्वप्न आम्हाला याची देही याची डोळा पाहायचं आहे आणि त्याची पहिली सुरुवात ही कलम ३७० हटवण्यापासून झाली आहे. कारण, आमच्या देशातीलच काश्मीर हे जर आम्ही आमचं म्हणू शकत नव्हतो, तर अखंड भारताचं स्वप्न काय होतं?, परंतु पंतप्रधान मोदींनी ते करून दाखवलं आणि आज आमचं काश्मीर कलम ३७० हटल्यामुळे पूर्णपणे अबाधित, अखंडित आमचंच आहे. कोणी त्यावर दावा सांगू शकत नाही. मला विश्वास आहे की यानंतर आता काय, कधी हे सांगण्या इतकी मला माहिती नाही. माझी ती क्षमता नाही, परंतु माझं स्वप्न आहे की जे पाकव्याप्त काश्मीर आहे, ते देखील भारताचं होईल आणि जो खरा अखंड भारत होता तो देखील एक दिवस तयार होईल. पण तोपर्यंत विभाजन विभीषिका दिवस पाळून आमच्या प्रत्येकाच्या मनातील शल्य हे आम्ही जिवंत ठेवणार आहोत.” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.याचबरोबर, “एवढंच नाही तर आपल्याला ११, १२ आणि १३ ऑगस्ट रोजी प्रभातफेऱ्या देखील काढायच्या आहेत. कारण, स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या जी काही उर्जा होती, ती प्रभात फेऱ्यांमध्ये होती. हे सर्व कार्यक्रम आपल्याला मनातून करायचे आहेत. प्रत्येक व्यक्तीला देशाच्या स्वातंत्र्याशी जोडायचं आहे. मला विश्वास आहे येणारं भविष्य आणि भवितव्य हे भारताचं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सामर्थ्यशील आणि सर्वांपर्यंत विकास पोहचवणारा भारत आपल्याला आपण तयार करू.” असा विश्वास देखील फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

प्रास्ताविक आयोजन समिती अध्यक्ष डॉ.राजेश पांडे यांनी केले. युवा संकल्प अभियान स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकांना अभिवादन करण्यासाठी आहे. किमान ५ लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या छायाचित्रांचा ऑनलाइन अल्बम करून गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे उपक्रमासाठी प्राप्त ५ लाख तिरंगा ध्वजाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयोजन समिती सदस्य डॉ. संजय चाकणे, प्रसेनजित फडणवीस, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, इतर सर्व अधिकार मंडळाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमापुर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तत्पूर्वी विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

युवा संकल्प अभियान
‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहभागी होत असून या निमित्ताने युवा संकल्प अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानात विद्यापीठाचे ५ लाखांहून अधिक आजी माजी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने सहभागी होतील असा प्रयत्न आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व घटकसंस्था, महाविद्यालये, परिसंस्था, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीदेखील स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दत्तक गावांमध्ये हा संकल्प प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला आहे. ७५० हून अधिक महाविद्यालये, ६५ हजार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, ३ हजारहून अधिक प्राध्यापक यांच्या एकत्रित प्रयत्नातून ५ लाखाहून अधिक विद्यार्थी व नागरिक आणि विविध सामाजिक क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...