रिलायन्स जिओ वरील ७२ कोटीच्या मेहेरबानीचा बाण मोरे- सुतारांच्या वर्मी का बसावा ?
मुंबई महापालिकेच्या कारभारावर आपण काहीही टिप्पणी केलेली नाहीच .
रिलायन्स जिओ प्रकरणावरून जनतेचे, प्रसारमाध्यमांचे लक्ष अन्यत्र विचलित करण्यासाठी आपल्यावर मोरे सुतारांचे वैयक्तिक आरोप
पुणे-महापालिकेतील महापौरांच्या अँँटीचेम्बर मधून सुरु झालेल्या मुख्य सभेचा मुद्दा कळीचा ठरल्यानंतर यावरून कॉंग्रेसचे माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी नगरविकास मंत्री शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणी वरून आणि त्या संदर्भात माध्यमांकडे व्यक्त केलेल्या भावनांवरून शिवसेना आणि कॉंग्रेस अशा निर्माण होऊ पाहणाऱ्या वादाच्या भोवऱ्यात शहर सेना प्रमुख संजय मोरे आणि सेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी …पद गेलेला अतृप्त आत्मा .. अशी शिंदे यांची संभावना करत शिंदेंवर केलेल्या टीकेला आज शिंदे यांनी देखील जास्तीत जास्त स्पष्ट उत्तर दिले आहे.हे देताना त्यांनी पृथ्वीराज सुतारांना , सभागृहनेत्याचा बोलका पोपट होऊ नका, असा सल्ला देत आपण पत्रकार परिषद जर रिलायन्स च्या ७२ कोटीच्या गैर व्यवहाराबाबत घेतली होती ,तर मग त्यावर एकही शब्दाचा उल्लेख न करता आपल्यावर केलेले आरोप म्हणजे रिलायन्स जिओ प्रकरणावरून जनतेचे, प्रसारमाध्यमांचे लक्ष अन्यत्र विचलित व्हावे याच हेतूने हा प्रकार घडलेला आहे.असे रिलायन्स जिओ बाबत मोरे सुतारांना एवढे ममत्व का ?असा सवाल हि अरविंद शिंदे यांनी केला आहे .
नेमके अरविंद शिंदे यांनी आपल्यावरील सेनेच्या या दोन्ही नेत्यांच्या टीकेला दिलेले उत्तर त्यांच्याच शब्दात वाचा …..
नुकतेच शिवसेना शहरप्रमुख श्री.संजय मोरे व गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी विस्मरणाची
व्याधी असलेला गजनी या सिनेपात्राची उपमा देत माझ्यावर टीका करणारे पत्र शिवसेनेच्या लेटरपॅडवर प्रसिध्दीस दिलेले आहे. याबाबत अनेक शिवसैनिकांची खाजगीत व मान्यवरांनी माझ्याकडे अस्वस्थता प्रकट केल्याने माझी भूमिका आपणाकडे सादर करत आहे.
सर्वप्रथम मी दिलेल्या पत्रकार परिषदेची व्हिडीओ पाहता मी शिवसेनेच्या अथवा मुंबई
म.न.पा.तील कारभारावर कोणतीही टीका केली नाही ही बाब आपल्या निर्दशनास येईन. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना यांबाबत मला नितांत आदर असून त्यांजसोबत माझे वैयक्तिक संबंध देखील सौर्हादाचे आहेत. प्रस्तुत प्रकरणी मी रिलायन्स जिओ व सत्ताधारी यांच्यावर संगनमताने र.स.७२ कोटींच्या गैरव्यवहार केलेचा आरोप केला असून याबाबत अॅॅण्टी करप्शन ब्युरो, नगरविकास विभाग यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल करत आहे. याबाबत सत्ताधारी भाजपाने हताशपणे मौन बाळगले असताना श्री. संजय मोरे व श्री. पृथ्वीराज सुतार या युतीने शिवसेनेच्या लेटरपॅडचा दुरूपयोग करत वैयक्तिक आरोप माझ्यावर केलेले आहेत. फक्त रिलायन्स जिओ प्रकरणावरून जनतेचे, प्रसारमाध्यमांचे लक्ष अन्यत्र विचलित व्हावे याच हेतूने हा प्रकार घडलेला आहे.
देशात लोकसभा, विधानसभा इत्यादी सर्वोच्च व्यासपीठे लोकप्रतिनिधींना त्यांचे प्रश्न मांडणेसाठी
उपलब्ध असणे ही बाब जनहितासाठी गरजेचे असते. पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सत्ताधाऱ्यांचा सुरू असलेला भोंगळ कारभार आणि बोकाळलेला भ्रष्टाचार मुख्य सभा होत नसल्याने व्यापक स्वरूपात होत आहे. ऑनलाईन होणाऱ्या कामात फक्त सोईचे विषय रेटून मंजूर करून घेण्यात येत असल्याने मुख्य सभा नेहमीप्रमाणे नियमित सुरू व्हावी या उद्देशाने मी सदरची पत्रकार परिषद घेतली होती. मी रिलायन्स जिओववर आरोप केलेला असताना बाणाचा वर्मी घाव मोरे सुतारांना का बसावा ? मी जे बोललो नाही याचा व्हिडीओ पुरावा असूनही मझ्यावर पक्षाच्या लेटरहेड वर वैयक्तिक आरोप का व्हावेत ? ज्या रिलायन्स जिओ प्रेस वरून सुतारांनी माझ्याविरुद्ध पत्रक काढले, त्या रिलायन्स जिओ बाबत प्रसिद्धीपत्रकात एकही शब्द का नसावा ? रिलायन्स जिओ बाबत मोरे सुतारांना एवढे ममत्व का ? याची उत्तरे देखील प्रसिद्धी पत्रक काढून दिली तरी चालतील .शहरप्रमुख संजय मोरे यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची काळजी करू नये . १२५ वर्षे जुन्या कॉंग्रेस पक्षामध्ये एखाद्या आरोपत्राद्वारे लक्ष वेधून शहराध्यक्ष पद निश्चित मिळत नाही .एखादे ऑफिस फोडून मिळालेल्या सवंग प्रसिद्धीच्या जोरावर कॉंग्रेस विचारधारेमध्ये कोणतेच पद मिळत नाही .त्याकरिता पक्ष व सामान्य जनता यांच्याशी प्रखर बांधिलकी व ध्येयवाद यांच्या समवेत निर्धाराने वाटचाल करावी लागते .अन्य पक्षावर टीका करावी असा कोणताही दबाव कॉंग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांवर टाकत नाही. या सर्व बाबी निश्चितच संजय मोरे यांच्या आकलन क्षमतेच्या बाहेर आहेत . तुमच्या पक्षाचे सभासद एखाद्या टेंडर विरोधात जोरदार पत्रकार परिषद घेतात त्याची व्यापकप्रसिध्दी करतात आणि प्रत्यक्षात स्थायी समितीमध्ये त्या प्रश्नावर चर्चा होत असताना मौन धारण करतात अशी अनेक प्रकरणे स्थायी इतिवृत्तांव्दारे स्मरण करून देण्याची माझी निश्चितच पूर्ण तयारी आहे. गजनी हे सिनेपात्र असल्याचा आरोप कोणी कोणावर करावा याचे आरोपकर्त्यांनी नक्कीच आत्मपरिक्षण करावे.
गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सभागृह नेते यांचा ‘ बोलका पोपट ‘ ही भूमिका बजावू नये.
पुणेकरांच्या प्रश्नांवर सभागृहात मौनीबाबा असणारे सुतार यांचा मुखवटा शिवसेनाचा आणि चेहरा
भाजपाचा आहे हे निश्चितच रिलायन्स जिओ प्रकरणावरून सिध्द होत आहे.
राज्यात आघाडी धर्म असल्याने कधीकधी इच्छा नसताना देखील गजनीची भूमिका घ्यावी
लागते. मात्र लोकशाही मुल्यांना फाटा देत लोकहिताच्या मुद्दयांवर बोलण्याऐवजी व्यक्तीगत पातळीवर निंदा नालस्ती करण्याचा टोकाचा प्रकार पुन्हा घडल्यास आम्हास प्रखरतेने उत्तर देण्यास भाग पाडू नये. वैयक्तिक स्वार्थाकरीता शहर हिताच्या महत्वाच्या मुद्दयांना बगल देवून शहराचे नुकसान करणाऱ्या लोकप्रतिनिधींना परमेश्वर सुबुध्दी देवो.