रूग्णांना संसर्गापासून वाचवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर
पुणे-पुणे हे प्रथम शहर आहे जिथे आयसीयू आणि सीसीयू मधील रुग्णांना होणारे संक्रमण टाळण्यासाठी सुरक्षित प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
रूबी हॉल क्लिनिकच्या अतिदक्षता विभागाच्या संचालिका प्राची साठे म्हणाल्या, ”रूग्णांची योग्य देखभाल करणे खूप गरजेचे आहे. रूग्न हाॅस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला कोणतेही संसर्ग होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी रूग्णालयाची असते.”
त्या पुढे म्हणाल्या, ”भारतातील बर्याच रूग्णालयांमध्ये विशेष काळजी घेतली जात नाही. अलीकडच्या काळात विविध रूग्णालयांमध्ये अहवाल सादर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये हाॅस्पिटलमध्ये वापरण्यात आलेल्या कमी दर्जाच्या उत्पादनांमुळे संसर्गला सामोरे जावे लागले आहे.”
अशा प्रकारच्या संक्रमणाचा शस्त्रक्रिया झालेल्या रूगणांवर जास्त परिणाम होतो. यामध्ये एचएआयचा (हाॅस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन) धोका सर्वाधिक असतो. अलिकडच्या काळात ही एक चिंतेची बाब बनली आहे.
संक्रमण प्रणालीमध्ये प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ज्यासाठी परिचारीकांनी रूग्णांच्या शरीरात द्रवपदार्थाचा समावेश करताना प्लास्टिक बाटलीमध्ये एक सुई टोचणे किंवा काचेच्या बाटल्या उघडण्यासाठी हवेचा प्रयोग करणे टाळावे. यामुळे सुक्ष्मजीवांच्या संसर्गापासून बचाव करता येईल.
डाॅ. साठे म्हणाल्या, ”अशा प्रकारचे संसर्ग टाळण्यासाठी काही हाॅस्पिटल आणि इन्स्टिट्यूटनी पुढाकार घेतला असून त्यांनी जर्मन टेक्नाॅलाॅजी फाॅर आयव्ही सोल्यूशन हा पर्याय निवडला आहे. यामध्ये बाटलीला कोणत्याही प्रकारची सुई टोचण्याची गरज नसेल.”
या टेक्नाॅलाॅजीबद्दल केवळ वैद्यकीय कर्मचारी उत्सुक नसून रूग्ण आणि त्यांचे कुटूंबीय देखील उत्सुक आहेत. यामुळे रूग्णांचे संसर्गापासून बचाव करण्यात येणार असून या प्रणालीचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी बाटलीला कोणत्याही प्रकारचे छिद्र करावे लागणार नसल्याने रूग्णांना बाहेरील हवेमुळे होणार्या संसर्गाचा धोका टळणार आहे.
सीडीएच आणि एनआयओएसएच सारख्या आंतराष्ट्रीय संस्था देखील औषध मिश्रण आणि रूग्णाला देण्यात येणार्या द्रवपदार्थांच्या प्रक्रियेतून संसर्ग होऊ शकते हे मान्य करतात. त्यासाठी ही प्रणाली खूप उपयोगी असल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रणालीतून योग्य प्रकारचा डोस दिला जाईल.
एचएआय (हाॅस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन) दरानुसार, भारतातील रूग्णांपर्यंत ही माहिती पोहोचवणे, जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. रूग्णांच्या सुरक्षेसाठी ही प्रगत प्रणाली नक्कीच उपयोगी पडू शकेल.