मुंबईसह उपनगरात वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. याविषयी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे. मुंबई, नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येणार नाही असे ट्वीट ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी केले आहे.
मुंबईमध्ये काही ठिकाणी अडीच तर उपनगरांमधील काही भागांमध्ये सहा ते आठ तास वीजपुरवठा खंडित झालेला होता. या प्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीत बिघाड झाल्यामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याचे पाहायला मिळाले होते. काही तास ही बत्ती गुल झाल्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसल्याचे पाहायला मिळाले होते. यासोबतच मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केल्याने यावर चर्चा होत आहे.