पुणे- बदल घडविण्याची राजनीती ठीक आहे पण होय मी बदला घेतला , असे बिनदिक्कत पणे माध्यमांना सांगत बदल घेण्याची राजनीती महाराष्ट्राला आणि देशाला मानविणारी निश्चित नाही, बदला घेण्याचे राजकारण सुरु झाले कि त्याला अंत राहत नाही हे लक्षात घेणाऱ्या महाराष्ट्रात हि बाब अजिबात भूषणावह नाही असे मत असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.
एखाद्या राजकीय कटुतेतून भारतीय जनता पक्षाचे नेते (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता) ‘हाेय, मी बदला घेतला’ म्हणणे धक्कादायक हाेते. ज्या संस्कृतीत मी वाढले, जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार माझ्यावर झाले, त्यानुसार विराेध हा वैचारिक असला पाहिजे. त्यात बदल्याची भाषा कधी नसते. राज्याच्या राजकारणात प्रथमच बदल्याची भाषा मी ऐकली व प्रसारमाध्यमात पाहिली अशा प्रकारे गाेष्टी करणे दुर्दैवी आहे, असे सुळे म्हणाल्या . त्या बारामती लाेकसभा मतदारसंघाचा दाैरा करताना पत्रकारांशी बाेलत होत्या.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक, खासदार संजय राऊत यांच्यावर आतापर्यंत माेठा अन्याय झालेला आहे. त्यांचे कुटुंबीय कशाप्रकारे त्रासातून गेलेले आहे, हे मी जवळून पाहिलेले असल्याचे सुळे म्हणाल्या.
एखाद्या राजकीय कटुतेतून भारतीय जनता पक्षाचे एक माेठे नेते (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता) ‘हाेय मी बदला घेतला’ म्हणणे धक्कादायक हाेते. ज्या संस्कृतीत मी वाढले, जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार माझ्यावर झाले त्यानुसार विराेध हा वैचारिक असला पाहिजे. त्यात बदल्याची भाषा कधी नसते; राज्याच्या राजकारणात प्रथमच बदल्याची भाषा मी ऐकली आणि प्रसारमाध्यमात पाहिली. अशाप्रकारे गाेष्टी करणे दुर्देवी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लाेकसभा मतदारसंघाचा दाैरा करताना पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.
सुळे म्हणाल्या, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संर्दभात जी कारवाई करण्यात आली त्यातून राज्यातील राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ झाले आहे, हे दिसून आले. अशाप्रकारे हीन दर्जाचे राजकारण मला कधी अपेक्षित नव्हते. परंतु दुर्देवाने तसे आपल्याकडे घडते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल त्या म्हणाल्या, विराेधकांना आमच्या संर्दभात बाेलण्यासाठी काेणती गाेष्ट नसल्याने जुन्या गाेष्टी पुन्हा बाहेर काढून त्या उगळत बसल्या जातात. अनेकवेळा यासंर्दभात चर्चा झाली. परंतु निष्पन्न काही झाले नाही. खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची हाेती.