पुणे- प्रत्यक्षात बोगस कर्मचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पुणे महापालिकेने कोणीही आत येवू जावू नये म्हणून कित्येक महिन्यांपासून महापालिकेचे सारे दरवाजे बंद करून ठेवले आहेत . असंख्य दरवाजे असलेल्या या महापालिकेचा एकच दरवाजा येण्यासाठी आणि एकाच जाण्यासाठी ठेवून मोठ्ठी वाहतूक कोंडी खुद्द यांनींच करून ठेवली आहे . याचा सर्वाधिक त्रास होतो तो महापालिकेबाहेर गाड्या लावून आत पायी ये -जा करणाऱ्यांना ,किंवा सार्वजनिक बस ने येणाऱ्यांना… पण सुरक्षा विभाग ज्यांच्याकडे ते खूप दक्ष अधिकारी … बोगस कर्मचाऱ्यांना थारा द्यायचा नाही म्हणून आलेल्या अहवालाने त्यांनी हि कोंडी तर करून ठेवली … पण ती बोगस कर्मचाऱ्यांची नाही तर आम जनतेची कोंडी ठरली …. हे सर्व ठाऊक असूनही ..महापालिकेचे पदाधिकारी मुग गिळून … निर्णयाचे स्वागत करत आले आहेत .
आज तर अजबच किस्सा घडला …
शिवसेनेचे आंदोलन महापालिकेच्या आवारात .. पायऱ्यांवर झाले. पण त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचा मोर्चा येईल म्हणून सारे दरवाजे कुलूप बंद करण्यात आले . अनेकांना पालिकेच्या कोर्टात यायचे होते आणि जायचे होते त्या साऱ्या नागरिकांची मोठी ससेहोलपट झाली ..शिवाय अधिकारी कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून मिळाला मनस्ताप …
मोर्चेकरूंनी सुदैवाने कोणतेही आक्रमक धोरण स्वीकारले नव्हते . अनेक प्रेस फोटोग्राफर आणि काही पत्रकार उड्या मारून आत आले ..त्यांना त्याक्षणी होणाऱ्या घटना टिपायच्या होत्या..
मोर्चा संपला ..पांगला .. तरीही दरवाजे उघडायचे कोणी नाव घेईना … पहा हा व्हिडीओ…
या व्हिडीओ मध्ये माजी महापौर राजलक्ष्मी भोसले तुम्हाला दिसतील ….. त्यांचे हि ऐकले नाही .. आणि पळून गेले सारे .. आमच्याकडे चावी नाही म्हणाले …. (पण अंदर कि बात है .. चाव्या त्यांच्याच खिशात होत्या … माळी साहेबांची ऑर्डर होती … आणि यांच्यात परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेण्याची हिम्मत मात्र नव्हती … केवळ आदेशाची गुलामगिरी …)
पहा हा व्हिडीओ…..