लोकशाहीमध्ये निवडणुका सरकार बनवण्याचा आणि लोकशिक्षणाचा महापर्व असतो. मतदानाची वाढत असलेली टक्केवारी एक शुभ संकेत आहे.
विकासासाठी गरिबांनी केलेले मतदान एका नवीन भारताचे दर्शन झाल्यासारखे आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा निकाल नवीन भारताचा पाया आहे.
मोदी पुढे म्हणाले की, “निवडणुकीचे हे निकाल ६५ टक्के तरुण वर्गाचा आणि महिलांचा नवीन भारत आहे, असा भारत जो काही मिळण्यापेक्षा काही नवीन करण्याची इच्छा निर्माण करणारा आहे. हा विचार नवीन भारताचा पाया आहे.
निवडणूक जनतेचा एक पवित्र आदेश असतो. परमेश्वराने आम्हाला या आदेशाचे पालन करता यावे एवढी शक्ती द्यावी.
झाडेही आपल्याला शिकवण देतात की, फळ लागल्यानंतर ते वाकतात. भाजपवर विजयाचे फळ लागले आहेत आणि यामुळे आपणही आणखी वाकून आणि नम्र होऊन जनतेची सेवा करणे आवश्यक आहे.
मी निवडणुकीप्रमाणे चालणार व्यक्ती नाही. 2022 मध्ये स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होतील. आतापर्यंतच्या सर्व सरकारने देशासाठी काम केले आहे. त्यांचाही आम्ही आदर करतो. आमच्याकडे पाच वर्षांचा काळ आहे. सव्वाशे कोटी जनतेने प्रत्येक वर्षी एक नवीन संकल्प केला तर देश मागे राहणार नाही. या निवडणूक निकालांच्या माध्यमातून नवीन ताकद मिळाली आहे. देशबांधवांमध्ये विकासाचे आंदोलन पूर्ण करायचे आहे. प्रत्येक व्यक्तीला मुख्यप्रवाहाशी जोडायचे आहे.